चंद्रपूर : महानगरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर चर्चा व उपाय शोधण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पुढाकारातून चंद्रपुरातील विविध सामाजिक संघटनांची एकजूट झाली आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी भारती हॉस्पिटलमध्ये ॲड. प्रशांत खजांची यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद रमाणिकभाई चव्हाण, सीबीएसएसचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा उपस्थित होते.
बैठकीत जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यात आली. आर्किटेक्ट रमणिकभाई चव्हाण यांनी यासंदर्भात २० वर्षांपासून आपण राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वाहतूक आराखडा तयार करून दिल्याचे सांगितले. तो आराखडा यावेळी त्यांनी समजावून सांगितला. ॲड. प्रशांत खजांची यांनी यासंदर्भात कायदेशीर बाबी समाजावून सांगत सर्व संघटनांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. युवा आर्किटेक्ट आनंद मुंधडा यांनी रस्त्यात किंचित बदल करून एक आराखडा तयार केला. यावर सर्वांचे जवळपास एकमत झाले. डॉ. गोपाल मुंधडा यांनी बैठकीची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, स्नेहकिंतचे अध्यक्ष डॉ. राजीव देवईकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामजीवन परमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे किशन झाडे, विजय चंदावर, संगीडवार, माणिकराव गोहोकार, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश उचके, रोटरी क्लब चांदा फोर्टचे अध्यक्ष अनिल व्यास, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्याम धोपटे, माजी अध्यक्ष डॉ. मनीष मुंधडा, जेसीआयचे अध्यन आनंद मुंधडा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल माडूरवार, दंतरोग तज्ज्ञ डॉ. श्याम गुंडावार, रेडक्रॉसचे डॉ. भानुदास दाभेरे, आयएमएचे डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. किरण देशपांडे, डॉ. भूपेश भलमे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, व्हाईस ऑफ युथ क्लबचे अध्यक्ष अरविंदरर्सिग धुन्ना, विठाई संस्थेच्या संजीवनी कुबेर, वनश्री मेश्राम, डॉ. सपन दास, शिशिर हालदार, ॲड. आशिष मुंधडा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. किरण देशपांडे तर आभार वनश्री मेश्राम यांनी मानले.