शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

बेरोजगारीमुळे विद्यार्थी नैराश्यतेच्या खाईत

By admin | Updated: August 15, 2015 01:22 IST

दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे.

गुंजेवाही : दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे. नोकरीसाठी आलेले अपशय आणि एक बेरोजगाराच जीवन जगणाऱ्या या युवा पिढीला ही बेरोजगारी नैराश्येच्या खाईत लोटत असल्याचे चित्र आता जागोजागी पाहावयास मिळत आहे.कित्येक युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात एक सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांना आशा असते. पण त्यावेळी चित्र हे उलटेच असते. कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानुसार ुमुलाखत दिली तर ‘कळवू’ असा शेरा त्यांना मिळतो आणि कधीच त्यांना कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात असे कितीतरी वर्ष निघून जातात. पण नोकरी नसल्याने आणि पाहिजे तसा व्यवसाय नसल्याने आजच्या तरुणांना नशिबी नैराश्य येत आहे. आजुबाजुला नजर टाकली तर असे चित्र दिसून येईल की, ज्यांच्या जवळ पैसा किंवा ओळख अशानाच नोकरीची संधी मिळते. सरकारी कार्यालय असो की, शिक्षण संस्था त्या आर्थिक व्यवहारातच गुंतलेल्या दिसतात. बेरोजगार युवक मोठ्या आशेने शिक्षण घेतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुत आहे, ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. ही खेदाची बाब आहे. यातून आजच्या तरुण पिढीला एक नैराश्य येत आहे. याचा विपरित परिणाम होऊन काही तरुण वाईट मार्गाला लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी अवैध धंदे करून आता पैसा मिळविण्याकडे त्यांचा कल आहे. परिस्थितीपुढे ते शरण होत आहे. त्यात त्यांचा काय दोष? आजच्या युवा पिढीवर उद्या या देशाचे भविष्य अवलंबून आहे. पण ही युवा पिढी अशी नैराश्येच्या गर्तेत खोल ढकलली जात असल्याने पुढे देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यासाठी शासनाने बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी ठोस योजना आखल्या पाहिजे. जेणेकरून युवकांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून आपला रोजगार मिळवू शकतील. ग्रामीण आणि शहरातही बेरोजगार वाढले असून दारू, सट्टा यासारख्या वाईट व्यसनाच्या मार्गाला लागून स्वत:चे जीवन उद्धवस्त करीत आहेत. दरवर्षी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण त्यांना उपयुक्त रोजगार मिळत नाही. त्यांच्या हाताला हवा तसा रोजगार उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शासनाचे नियोजन हवे. (वार्ताहर)