शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीमुळे विद्यार्थी नैराश्यतेच्या खाईत

By admin | Updated: August 15, 2015 01:22 IST

दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे.

गुंजेवाही : दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे. नोकरीसाठी आलेले अपशय आणि एक बेरोजगाराच जीवन जगणाऱ्या या युवा पिढीला ही बेरोजगारी नैराश्येच्या खाईत लोटत असल्याचे चित्र आता जागोजागी पाहावयास मिळत आहे.कित्येक युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात एक सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांना आशा असते. पण त्यावेळी चित्र हे उलटेच असते. कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानुसार ुमुलाखत दिली तर ‘कळवू’ असा शेरा त्यांना मिळतो आणि कधीच त्यांना कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात असे कितीतरी वर्ष निघून जातात. पण नोकरी नसल्याने आणि पाहिजे तसा व्यवसाय नसल्याने आजच्या तरुणांना नशिबी नैराश्य येत आहे. आजुबाजुला नजर टाकली तर असे चित्र दिसून येईल की, ज्यांच्या जवळ पैसा किंवा ओळख अशानाच नोकरीची संधी मिळते. सरकारी कार्यालय असो की, शिक्षण संस्था त्या आर्थिक व्यवहारातच गुंतलेल्या दिसतात. बेरोजगार युवक मोठ्या आशेने शिक्षण घेतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुत आहे, ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. ही खेदाची बाब आहे. यातून आजच्या तरुण पिढीला एक नैराश्य येत आहे. याचा विपरित परिणाम होऊन काही तरुण वाईट मार्गाला लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी अवैध धंदे करून आता पैसा मिळविण्याकडे त्यांचा कल आहे. परिस्थितीपुढे ते शरण होत आहे. त्यात त्यांचा काय दोष? आजच्या युवा पिढीवर उद्या या देशाचे भविष्य अवलंबून आहे. पण ही युवा पिढी अशी नैराश्येच्या गर्तेत खोल ढकलली जात असल्याने पुढे देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यासाठी शासनाने बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी ठोस योजना आखल्या पाहिजे. जेणेकरून युवकांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून आपला रोजगार मिळवू शकतील. ग्रामीण आणि शहरातही बेरोजगार वाढले असून दारू, सट्टा यासारख्या वाईट व्यसनाच्या मार्गाला लागून स्वत:चे जीवन उद्धवस्त करीत आहेत. दरवर्षी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण त्यांना उपयुक्त रोजगार मिळत नाही. त्यांच्या हाताला हवा तसा रोजगार उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शासनाचे नियोजन हवे. (वार्ताहर)