शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

गाव विकासासाठी बेरोजगार युवक उतरले निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

अमोद गौरकर शंकरपूर : आंबोली एक छोटेसे गाव. या छोट्याशा गावात उच्च विद्याविभूषित विद्यार्थी परंतु सध्या बेरोजगार असलेले ...

अमोद गौरकर

शंकरपूर : आंबोली एक छोटेसे गाव. या छोट्याशा गावात उच्च विद्याविभूषित विद्यार्थी परंतु सध्या बेरोजगार असलेले युवक एकत्र आले. गावातीलच विकासासाठी मागील दोन वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू केले. गावातील समस्या वारंवार सरपंच व ग्रामपंचायत यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या या समस्यांकडे ग्रामपंचायतीने कानाडोळा केला. त्यामुळे या युवकांनी यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांची पॅनेल तयार करून थेट निवडणूक रिंगणात उतरले. या गावात दिग्गजांच्या समोर हे बेरोजगार युवक समोरासमोर आले आहेत.

शंकरपूरपासून जवळच असलेले आंबोली हे ते गाव. या गावात नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. या गावातले युवक व युवती शिक्षणासाठी बाहेर गेले होते. बाहेरूनच शिक्षण घेऊन ते गावात आले. गावात या युवकांनी गाव सुधारण्यासाठी युवा मंचची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम केले. यासोबतच नाले व रस्ते स्वच्छ केले. गवतकाडी झुडपाने वेढलेली स्मशानभूमी स्वच्छ केली. याशिवाय लोकांना शासकीय प्रशासकीय कामात मदत लागत होती किंवा कोणतीही अडचण येत होती, त्या अडचणी सोडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य युवा मंचच्या विद्यार्थ्यांनी केले. सर्वात मोठे म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व शाळा बंद होत्या. पण या युवकांनी गावातील मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षण देण्याचे काम केले. गावातील भिंती बोलक्या केल्या. गाव विकासासाठी ग्रामपंचायतीवर सत्ता असणे गरजेचे आहे, हे त्यांना समजून आले. त्यामुळे त्यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपणच उभे राहून गावाचा विकास घडवूया असा संकल्प केला आणि हे उच्च विद्याविभूषित विद्यार्थी युवा मंच परिवर्तन पॅनेल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे झाले आहेत.

यात कला शाखेचा पदवीधर असलेला केशव गजबे, बीएड झालेली प्रतिमा शिवरकर, कल्पना बगळे, अभियंता वैभव ठाकरे, कला शाखेची पदवीधर शालिनी दहोत्रे, वाणिज्य शाखेत पदवी असलेला शुभम मंडपे, कृषी शाखेत बीएससी असलेला स्वप्नील गजबे, सायन्स शाखेची पदवी असलेली प्रियंका नागोसे आणि कला शाखेत पदवीधर असलेली रज्जू सवाईकर या तरुण-तरुणींचा समावेश आहे. हे सर्व २७ वर्षांच्या आतील आहेत. त्यांच्याजवळ निवडणुकीसाठी लागणारा खर्च नसल्यामुळे त्यांनी गावात आवाहन करून नागरिकांकडेच मदतीची मागणी केली आहे. ही युवा पिढी गावात असलेल्या दिग्गजांना पराभूत करते की नाही हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दिसेल. परंतु हे युवक निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे दिग्गजांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत.