शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:39 IST

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.

ठळक मुद्देदररोज किरकोळ अपघातएकाच मार्गावर दररोज मलमपट्टीमनपा व पालिकेचे नाममात्र लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.चंद्रपूर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगल ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघांचा अपघातातमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना मातीमिश्रित साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरुन वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडून वाहनचालकांना त्रास होत होता. मात्र मागील पाच दिवस चंद्रपुरात संततधार पाऊस पडला. त्यामुळे डागडूजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. मात्र अजूनही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.शिक्षिकेचा बळी घेतल्यानंतरही ते खड्डे जैसे थेशहरातील तुकूम रोेडवर असलेल्या वाहतूक कार्यालयासमोरील मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरात बँक, हॉटेल, पोलीस मुख्यालय, कृषी कार्यालये आहेत. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅॅव्हल्स याठिकाणी लागत असतात. तसेच या मार्गाने दुर्गापूरकडून येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडल्याने वाहन चालविताना अडचणीचा आहे. मागील महिन्यात या रस्त्यावर झालेल्या एका अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. दर नियमित लहान-सहान अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. मात्र शहरातील रस्त्याची स्थिती जैसे-थै आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पार्किंगची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होते. त्यातही रस्त्याची दैना परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.शहरातील खड्डे बुजवा - शहर काँग्रेसचे आयुक्तांना निवेदनचंद्रपूर शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी पाणी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, राजू दास, दिपक कटकोजवार, सुरेश आत्राम, विशाल दास आदी उपस्थित होते. पाणी गेल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन व होम हवन करण्याच्या इशारा त्यांनी दिला.मणक्याच्या व पाठीच्या आजारात वाढचंद्रपूर शहर हे संपूर्ण राज्यात प्रदूषीत शहर म्हणून अग्रस्थानी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नियमीत वाहन चालविणाºया वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार घडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.