शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:39 IST

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.

ठळक मुद्देदररोज किरकोळ अपघातएकाच मार्गावर दररोज मलमपट्टीमनपा व पालिकेचे नाममात्र लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.चंद्रपूर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगल ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघांचा अपघातातमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना मातीमिश्रित साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरुन वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडून वाहनचालकांना त्रास होत होता. मात्र मागील पाच दिवस चंद्रपुरात संततधार पाऊस पडला. त्यामुळे डागडूजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. मात्र अजूनही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.शिक्षिकेचा बळी घेतल्यानंतरही ते खड्डे जैसे थेशहरातील तुकूम रोेडवर असलेल्या वाहतूक कार्यालयासमोरील मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरात बँक, हॉटेल, पोलीस मुख्यालय, कृषी कार्यालये आहेत. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅॅव्हल्स याठिकाणी लागत असतात. तसेच या मार्गाने दुर्गापूरकडून येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडल्याने वाहन चालविताना अडचणीचा आहे. मागील महिन्यात या रस्त्यावर झालेल्या एका अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. दर नियमित लहान-सहान अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. मात्र शहरातील रस्त्याची स्थिती जैसे-थै आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पार्किंगची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होते. त्यातही रस्त्याची दैना परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.शहरातील खड्डे बुजवा - शहर काँग्रेसचे आयुक्तांना निवेदनचंद्रपूर शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी पाणी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, राजू दास, दिपक कटकोजवार, सुरेश आत्राम, विशाल दास आदी उपस्थित होते. पाणी गेल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन व होम हवन करण्याच्या इशारा त्यांनी दिला.मणक्याच्या व पाठीच्या आजारात वाढचंद्रपूर शहर हे संपूर्ण राज्यात प्रदूषीत शहर म्हणून अग्रस्थानी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नियमीत वाहन चालविणाºया वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार घडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.