शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:39 IST

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.

ठळक मुद्देदररोज किरकोळ अपघातएकाच मार्गावर दररोज मलमपट्टीमनपा व पालिकेचे नाममात्र लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.चंद्रपूर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगल ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघांचा अपघातातमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना मातीमिश्रित साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरुन वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडून वाहनचालकांना त्रास होत होता. मात्र मागील पाच दिवस चंद्रपुरात संततधार पाऊस पडला. त्यामुळे डागडूजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. मात्र अजूनही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.शिक्षिकेचा बळी घेतल्यानंतरही ते खड्डे जैसे थेशहरातील तुकूम रोेडवर असलेल्या वाहतूक कार्यालयासमोरील मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरात बँक, हॉटेल, पोलीस मुख्यालय, कृषी कार्यालये आहेत. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅॅव्हल्स याठिकाणी लागत असतात. तसेच या मार्गाने दुर्गापूरकडून येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडल्याने वाहन चालविताना अडचणीचा आहे. मागील महिन्यात या रस्त्यावर झालेल्या एका अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. दर नियमित लहान-सहान अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. मात्र शहरातील रस्त्याची स्थिती जैसे-थै आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पार्किंगची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होते. त्यातही रस्त्याची दैना परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.शहरातील खड्डे बुजवा - शहर काँग्रेसचे आयुक्तांना निवेदनचंद्रपूर शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी पाणी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, राजू दास, दिपक कटकोजवार, सुरेश आत्राम, विशाल दास आदी उपस्थित होते. पाणी गेल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन व होम हवन करण्याच्या इशारा त्यांनी दिला.मणक्याच्या व पाठीच्या आजारात वाढचंद्रपूर शहर हे संपूर्ण राज्यात प्रदूषीत शहर म्हणून अग्रस्थानी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नियमीत वाहन चालविणाºया वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार घडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.