शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 11:50 IST

कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे.

ठळक मुद्देलाईमस्टाेन उत्खननाकडेच लक्ष : कुसुंबीवासीयांचा मुलभूत हक्कासाठी वर्षानुवर्षे लढा

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील आदिवासींची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटशी अस्तित्त्वासाठी लढाई सुरू आहे. जमिनीसाठी दोन्ही घटकात न्यायालयीन लढाई सुरू असली तरी संवेदना जागृत ठेवून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने कुसुंबी येथील आदिवासींसाठी अनेक पायाभूत सुविधांसह इतर कार्य करणे अपेक्षित होते. मात्र, कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. कुसुंबी येथील लाईम स्टोनची खाण अल्ट्राटेकसाठी केजीएफ बनली आहे.

१०० टक्के आदिवासींची लोकसंख्या असलेला कुसुंबी गाव आहे. हा गाव 'पेसा' कायद्यांतर्गत येतो. पेसा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतलेला निर्णय शासनाला मान्य करावा लागतो. माणिकगड सिमेंट कंपनीने जमिनी घेताना ग्रामसभेत ठराव झाला की नाही तेसुद्धा महत्त्वाचे असून, त्याबाबत चौकशी झाली पाहिजे. आदिवासींना त्यांची संस्कृती व त्यांच्या संपत्तीपासून अलिप्त करता येत नाही, हे पेसा कायदा सांगतो. त्यामुळे आदिवासींच्या शेतजमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने घेण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी घेणे अनिवार्य होते.

माणिकगड सिमेंट कंपनीच्या खाणीमुळे कुसुंबी येथील तीन पिढ्या प्रभावित झाल्या असून, ३६ वर्षांपासून २४ आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरित आहे. कंपनी प्रशासनाकडून जमिनीचा मोबदला दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याचे ठोस पुरावे मिळत नाहीत. भोगवटदार म्हणून सातबारा उताऱ्यावर अजूनही आदिवासींची नावे आहेत. कुसुंबी येथील जमीन लाईमस्टोन काढण्यासाठी २०३१ लीजवर कंपनीला दिली असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. लीज दिल्यानंतर नियमानुसारच उत्खनन होत आहे वा नाही, याचे या विभागालाही काही घेणे-देेणे असल्याचे दिसून येत नाही.

सातबारा अचानक कंपनीचे नाव कसे?

सन १९७९पासून २०१३पर्यंत ३४ वर्षे माणिकगड सिमेंट कंपनीचे नाव कुसुंबी येथील आदिवासींच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदार किंवा इतर अधिकारात नव्हते. मग कंपनी २०२१ मध्ये सातबारा उताऱ्यांची मालक कशी झाली, असा प्रश्न तलाठी विनोद खोब्रागडे यांनी विचारला आहे.

कुसुंबीवासीयांना ना घरे, ना रस्ता, ना वीज, ना पाणी

कुसुंबीच्या आजुबाजुला विपुल लाईमस्टोनची खनिज संपत्ती आहे. गावाच्या खालीसुद्धा मोठ्या प्रमाणात लाईमस्टोन आहे. त्यासाठीच कुसुंबी गावाला येथून हटवण्याच्या हालचाली अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटकडून सुरू आहेत. या गावात एकही पायाभूत सुविधा नसून गावकऱ्यांपर्यंत शासनाचे एकही घर पोहोचले नाही. शिवाय गावात जायला साधा रस्ता नाही, वीज तर नाहीच नाही. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर