शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 11:50 IST

कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे.

ठळक मुद्देलाईमस्टाेन उत्खननाकडेच लक्ष : कुसुंबीवासीयांचा मुलभूत हक्कासाठी वर्षानुवर्षे लढा

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील आदिवासींची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटशी अस्तित्त्वासाठी लढाई सुरू आहे. जमिनीसाठी दोन्ही घटकात न्यायालयीन लढाई सुरू असली तरी संवेदना जागृत ठेवून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने कुसुंबी येथील आदिवासींसाठी अनेक पायाभूत सुविधांसह इतर कार्य करणे अपेक्षित होते. मात्र, कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. कुसुंबी येथील लाईम स्टोनची खाण अल्ट्राटेकसाठी केजीएफ बनली आहे.

१०० टक्के आदिवासींची लोकसंख्या असलेला कुसुंबी गाव आहे. हा गाव 'पेसा' कायद्यांतर्गत येतो. पेसा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतलेला निर्णय शासनाला मान्य करावा लागतो. माणिकगड सिमेंट कंपनीने जमिनी घेताना ग्रामसभेत ठराव झाला की नाही तेसुद्धा महत्त्वाचे असून, त्याबाबत चौकशी झाली पाहिजे. आदिवासींना त्यांची संस्कृती व त्यांच्या संपत्तीपासून अलिप्त करता येत नाही, हे पेसा कायदा सांगतो. त्यामुळे आदिवासींच्या शेतजमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने घेण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी घेणे अनिवार्य होते.

माणिकगड सिमेंट कंपनीच्या खाणीमुळे कुसुंबी येथील तीन पिढ्या प्रभावित झाल्या असून, ३६ वर्षांपासून २४ आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरित आहे. कंपनी प्रशासनाकडून जमिनीचा मोबदला दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याचे ठोस पुरावे मिळत नाहीत. भोगवटदार म्हणून सातबारा उताऱ्यावर अजूनही आदिवासींची नावे आहेत. कुसुंबी येथील जमीन लाईमस्टोन काढण्यासाठी २०३१ लीजवर कंपनीला दिली असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. लीज दिल्यानंतर नियमानुसारच उत्खनन होत आहे वा नाही, याचे या विभागालाही काही घेणे-देेणे असल्याचे दिसून येत नाही.

सातबारा अचानक कंपनीचे नाव कसे?

सन १९७९पासून २०१३पर्यंत ३४ वर्षे माणिकगड सिमेंट कंपनीचे नाव कुसुंबी येथील आदिवासींच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदार किंवा इतर अधिकारात नव्हते. मग कंपनी २०२१ मध्ये सातबारा उताऱ्यांची मालक कशी झाली, असा प्रश्न तलाठी विनोद खोब्रागडे यांनी विचारला आहे.

कुसुंबीवासीयांना ना घरे, ना रस्ता, ना वीज, ना पाणी

कुसुंबीच्या आजुबाजुला विपुल लाईमस्टोनची खनिज संपत्ती आहे. गावाच्या खालीसुद्धा मोठ्या प्रमाणात लाईमस्टोन आहे. त्यासाठीच कुसुंबी गावाला येथून हटवण्याच्या हालचाली अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटकडून सुरू आहेत. या गावात एकही पायाभूत सुविधा नसून गावकऱ्यांपर्यंत शासनाचे एकही घर पोहोचले नाही. शिवाय गावात जायला साधा रस्ता नाही, वीज तर नाहीच नाही. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर