शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बंद असलेल्या शाळा आता सुरू होणार असून, जिल्ह्यात दोन हजारांवर शाळांमध्ये आजपासून घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असल्याच्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शाळा प्रशासनानेही वर्गातील धूळ साफ केली असून, पुन्हा नव्या दमाने शाळेतील किलबिल सुरू होणार आहे.जिल्ह्यात २ हजार ५०४ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ६३७ शासकीय, तर ४८९ खासगी शाळा आहेत. शहरी भागातील आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे प्रशासनाने शाळांना तसे निर्देश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन पूर्ण केले आहे. शाळा पूणर्णवेळ सुरु राहणार असल्या तरी परीपाठ किंवा इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. शालेय पोषण संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच जेवणाचा डब्बा आणावा लागणार आहे. त्यातही सामुहिकरित्या बसून जेवणावरही निर्बंध आहे.

अधिकारी देणार भेटीमागील दीड वर्षानंतर आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या शाळांचे नियोजन तसेच कोरोना नियम, शिक्षकांची उपस्थिती या सर्व बाबींकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

शाळांमध्ये ठणठणाट- शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

पालकांमध्ये आनंद- मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी मोबाईलच्या मोहजाळ्यात अडकले होते. त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. - आता शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुलांना ठेवण्याची चिंता मिटली 

शाळा बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आम्ही शेतात जातो. मुले पूर्वी शाळेत असायची. त्यामुळे चिंता नव्हती. शाळा नसल्याने आपली मुले शाळेविना गावात सुरक्षित कशी राहील, याची भीती प्रत्येक आई-वडिलांना होती. आता शाळा सुरू होणार असल्याने पाल्य किमान दिवसभर शाळेत शिक्षकांसमवेत सुरक्षित राहील. शिवाय शैक्षणिक नुकसानही होणार नाही.- रूपाली लोेहे, पालक, गोवरी

 कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषत: शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांनाही शैक्षणिक प्रवाहात आणण्यात येणार आहे.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू होणार असल्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे.- जे.डी. पोटेशिक्षण समिती सदस्यजि.प. चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळा