शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बंद असलेल्या शाळा आता सुरू होणार असून, जिल्ह्यात दोन हजारांवर शाळांमध्ये आजपासून घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असल्याच्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शाळा प्रशासनानेही वर्गातील धूळ साफ केली असून, पुन्हा नव्या दमाने शाळेतील किलबिल सुरू होणार आहे.जिल्ह्यात २ हजार ५०४ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ६३७ शासकीय, तर ४८९ खासगी शाळा आहेत. शहरी भागातील आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे प्रशासनाने शाळांना तसे निर्देश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन पूर्ण केले आहे. शाळा पूणर्णवेळ सुरु राहणार असल्या तरी परीपाठ किंवा इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. शालेय पोषण संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच जेवणाचा डब्बा आणावा लागणार आहे. त्यातही सामुहिकरित्या बसून जेवणावरही निर्बंध आहे.

अधिकारी देणार भेटीमागील दीड वर्षानंतर आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या शाळांचे नियोजन तसेच कोरोना नियम, शिक्षकांची उपस्थिती या सर्व बाबींकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

शाळांमध्ये ठणठणाट- शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

पालकांमध्ये आनंद- मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी मोबाईलच्या मोहजाळ्यात अडकले होते. त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. - आता शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुलांना ठेवण्याची चिंता मिटली 

शाळा बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आम्ही शेतात जातो. मुले पूर्वी शाळेत असायची. त्यामुळे चिंता नव्हती. शाळा नसल्याने आपली मुले शाळेविना गावात सुरक्षित कशी राहील, याची भीती प्रत्येक आई-वडिलांना होती. आता शाळा सुरू होणार असल्याने पाल्य किमान दिवसभर शाळेत शिक्षकांसमवेत सुरक्षित राहील. शिवाय शैक्षणिक नुकसानही होणार नाही.- रूपाली लोेहे, पालक, गोवरी

 कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषत: शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांनाही शैक्षणिक प्रवाहात आणण्यात येणार आहे.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू होणार असल्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे.- जे.डी. पोटेशिक्षण समिती सदस्यजि.प. चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळा