शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

चंद्रपूर जिल्ह्यात बनणार दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:18 IST

शेतकऱ्यांना मिळणार लाभ : बल्लारपूर व जिवतीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : ज्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. १७ एप्रिलला मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्त्वतः शासन निर्णय घेण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन बाजार समितींचा समावेश करण्यात आला आहे. या दोन बाजार समितींमध्ये बल्लारपूर व जिवतीचा समावेश आहे. नवीन बाजार समिती निर्माण झाल्यास शेतमाल विक्रीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. 

ज्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार १७ एप्रिलला शासन निर्णय काढून मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत 'एक तालुका, एक बाजार समिती' योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाजार समित्या नसलेल्या बल्लारपूर व जिवती या दोन तालुक्यांमध्ये बाजार समित्या नव्याने अस्तित्वात येणार आहेत. १७ एप्रिलला शासन निर्णय काढून मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत 'एक तालुका, एक बाजार समिती' योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती महत्त्वाचीचमहाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला विविध शेतमाल हा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व कृषी मालाच्या वितरणासाठी एकाच ठिकाणी सुविधा व्हावी, तसेच या कामासाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र यंत्रणा असावी, या उद्देशाने सक्षम विपणन व्यवस्था म्हणून "कृषी उत्पन्न बाजार समिती" असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था नसल्यास शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खासगी व्यापाऱ्यास विक्री करणे तसेच शेतकऱ्यांना दूरच्या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी नेणे आदी बाबींमुळे आर्थिक नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नसल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील ३ तालुके वगळून उर्वरित ६५ तालुक्यांमध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्त्वतः निर्णय घेण्यात आला आहे.

अशी चालणार प्रक्रियामूलभूत पायाभूत सुविधांसाठी आवश्यक क्षेत्राची निश्चिती करून शासकीय जमीन नाममात्र दराने देणेबाबत पणन विभागामार्फत महसूल विभागास प्रस्ताव सादर करावा, आवश्यकतेनुसार किमान मनुष्यबळाची संख्या निश्चित करून अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कार्यप्रणालीचा अवलंब करून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात यावे, प्रस्तावित बाजार समितीसाठी कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार अडते व व्यापाऱ्यांचे परवाने तसेच अनुज्ञप्ती देण्यासंदर्भात विहित कार्यप्रणालीनुसार सक्षम प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र