शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

अतिक्रमण हटविण्यासाठी दोन लाखांचा भुर्दंड

By admin | Updated: June 29, 2016 01:08 IST

बोंड येथील संरक्षित जंगलाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याला आता चार दिवस उलटले आहेत.

वनविभागाचे मनुष्यबळ खर्ची : बोंड येथील अतिक्रमण हटाव प्रकरण घनश्याम नवघडे नागभीडबोंड येथील संरक्षित जंगलाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याला आता चार दिवस उलटले आहेत. मात्र या घटनेतील कवित्वाची अद्यापही लोक चर्चा करीत आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी शासकीय यंत्रणेचे मोठे मनुष्यबळ खर्ची पडलेच. पण, त्याचबरोबर वनविभागाला दोन लाख रूपये खर्च करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. बोंड येथील जवळपास ३१ शेतकऱ्यांनी तेथील संरक्षित जंगलात ३१ हेक्टर जागेवर अतिक्रमण केले होते. जवळपास तीन ते चार महिन्यांपासून हे अतिक्रमण सुरु होते. असे असले तरी स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी होत असलेल्या या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे अतिक्रमण वाढतच गेले आणि एक-दोन नाही तर तब्बल ३१ हेक्टर म्हणजेच शंभर एकरावर हे अतिक्रमण झाले.दरम्यान तळोधी (बाळा.) येथे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून अभिलाषा सोनटक्के रुजू झाल्या आणि त्यांचे पेट्रोलींग दरम्यान या अतिक्रणाकडे लक्ष गेले. याबाबत त्यांनी सर्व माहिती गोळा करुन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मागितली आणि हे अतिक्रमण हटविण्यात आले.हे अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी यातील कवित्व अद्यापही कायम आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी किती मनुष्यबळाचा वापर करण्यात आला, हे अतिक्रमण हटविण्यासाठी कोणत्या, कोणत्या विभागाची मदत झाली आणि यावर किती खर्च आला, असावा याचे ठोकताळे लोक अजूनही मांडताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी जातीने हजर होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण दिवसाचे योगदान दिले. कार्यालयीन कामकाजाचे हे महत्त्वाचे दिवस असूनही त्यांनी दिलेल्या योगदानाची कर्मचारी वर्गात अजूनही चर्चा सुरु आहे. असे असले तरी हे अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभागाला आर्थिक झळ सोसावी लागली, ते तर वेगळेच. हे अतिक्रमण वेळीच थांबविले असते तर, ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रियाही नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.अतिक्रमण हटविण्यासाठी आम्हाला महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे मोालाचे सहकार्य लाभले. आर्थिक बाबीचा विचार केला तर हे अतिक्रमण हटविण्यासाठी दीड ते दोन लाखाच्या दरम्यान खर्च आला.- आशिष ठाकरे, डीएफओ, ब्रह्मपुरी.]