शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांत गणवेश खरेदीसाठी होणार कसरत

By admin | Updated: June 18, 2017 00:34 IST

बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात.

रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर : मोफत गणवेशाचा मार्ग खडतरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या २०० रुपयांत आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कापड विकत येणे कठीण आहे. २०० रुपये कापडावरच खर्च झाल्यानंतर शिलाईचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर असणार आहे. पूर्वी शाळा स्तरावरुन एकत्रितरीत्या कापड अथवा रेडीमड ड्रेस खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे २०० रुपयांत गणवेश तयार होत होते. परंतु, चालू शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे २०० रुपयांमध्ये गणवेशाचे कापड खरेदी करून ते शिवण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेंतर्गत एका गणवेशासाठी २०० रुपये देऊन विद्यार्थ्याची बोळवण केली जात आहे. मागील काही वर्षांपासून गणवेशाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. परंतु गणवेशाचे पैसे शाळा स्तरावर देण्यात येत होते. या रक्कमेतून शाळास्तरावरच एकत्रितरीत्या गणवेश खरेदी करण्यात येत होते. अनेकवेळा सहावी-सातवी आणि आठवीच्या वर्गाची विद्यार्थ्यी संख्या अधिक असल्यानंतर पैसे कमी पडत. अशावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आर्थिक हातभार लावायचे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी नवीन गणवेशात शाळेत येत होते.परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेशासाठी दिले जाणारे प्रत्येकी दोनशे रुपये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता गणवेश खरेदीची जबाबदारी थेट पालकांच्या खांद्यावर आली आहे. एकीकडे एखादा रुमाल घ्यायचा असला तरी २५ ते ५० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे शासन २०० रुपयामध्ये आठवीच्या वर्गातील म्हणजेच १४-१५ वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता दोनशे रुपयात गणवेश घ्या, असे सांगत आहे. त्यामुळे ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, ते खिशातून रक्कम टाकून गणवेश खरेदी करू शकतात.मात्र गावनिहाय विचार केल्यास अशा पालकाची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ज्यांचे हातावर आणून पानावर खाणे आहे, असे पालक जास्तीचे पैसे कुठून आणणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारपेठेतील दराचा विचार करीत गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी, अथवा शाळेनेच गणवेश पुरवावे, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.शाळेतूनच गणवेश वाटप करावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. याच धर्तीवर गणवेश वाटप करावे, अशी मागणी आता पालकांकडून होत आहे. एकत्रितरित्या खरेदी केल्याशिवाय २०० रुपयांच्या बजेटमध्ये गणवेश बसत नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम न टाकता खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून गणवेश पुरवावेत, असे पालकांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषदेने वाटा उचलावामोफत गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालकांना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणवेश केवळ २०० रुपयांत खरेदी लागणार आहे. महागाई लक्षात घेता २०० रुपयांत गणवेश मिळणे कठीण आहे व बँकेत पैशाच्या टंचाईने पालकांना २०० रुपयांसाठी रांगेत उभे राहाणे कठीण होईल. त्यामुळे कमी पडणाऱ्या रकमेचा वाटा जिल्हा परिषदेने उचलावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.चिमूर तालुक्यात१७ हजार विद्यार्थीचिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गापर्यंत जवळपास १७ हजारांच्या घरात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात किमान १६ ते १७ हजार विद्यार्थी मोफत गणवेश वाटप योजनेचे लाभार्थी आहेत.