शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

दोनशे घरकूल, ३६५ शौचालयांचे काम अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:16 IST

रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.

ठळक मुद्देरेतीची टंचाई : घाटांचे लिलावच नाही

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.बांधकामात रेती हा घटक महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून मातीच्या घरांची निर्मिती बंद झाली आहे. माणूस कोणीही असो आपल्या कुवतीनुसार तो विटा सिमेंटचेच घर बांधतो. म्हणूनच गेल्या काही वर्षात रेतीची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आणि यातून शासनाला करोडो रूपयांचा महसूलही प्राप्त होऊ लागले आहे. मात्र यावर्षी शासनाने रेती घाटांचा वेळेवर लिलाव न केल्याने रेतीची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व बांधकाम ठप्प झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो मजूर, शेकडो कंत्राटदार बेकारीचे जीवन जगत आहेत.सुत्राच्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात २०१६ -१७ या आर्थिक वर्षातील २८, २०१७ - १८ या आर्थिक वर्षातील ५० तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षातील ८६ घरकुलांच्या कामांना रेती टंचाईचा फटका बसला असून रेतीअभावी ही कामे बंद असल्याची माहिती आहे. २०१७ - १८ मध्ये रमाई योजनेत मंजुरी मिळालेले ३६ घरकुलांची स्थिती अशीच आहे. घरकुलांप्रमाणेच नागभीड तालुक्यात शौचालयांची कामे बंद आहेत. जवळपास ३६५ शौचालयाचे काम रेतीअभावी बंद असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक ग्रा.प.भवन, रस्त्यांची कामे या रेती टंचाईच्या कचाट्यात सापडली आहेत. केवळ शासकीय कामेच नाही तर खासगी कामेही बंद पडली आहेत.शासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रखडलेले रेती घाटांचे लिलाव तत्काळ करावे, अशी मागणी केली जात आहे.विटा व्यवसायात मंदीया रेती टंचाईचा फटका विटा व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बांधकामेच नसल्याने विटांचा खप मंदावला आहे. परिणामी विटा व्यावसायिकांनी विटांचे उत्पादन कमी केले आहे. एका विटाभट्टीवर जवळपास १०० मजूर काम करतात. अशीच रेती टंचाई राहिली तर भविष्यात या मजुरांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. नागभीड तालुक्यात शेकडोच्या घरात विटाभट्ट्या आहेत, हे विशेष.