शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दोनशे घरकूल, ३६५ शौचालयांचे काम अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:16 IST

रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.

ठळक मुद्देरेतीची टंचाई : घाटांचे लिलावच नाही

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.बांधकामात रेती हा घटक महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून मातीच्या घरांची निर्मिती बंद झाली आहे. माणूस कोणीही असो आपल्या कुवतीनुसार तो विटा सिमेंटचेच घर बांधतो. म्हणूनच गेल्या काही वर्षात रेतीची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आणि यातून शासनाला करोडो रूपयांचा महसूलही प्राप्त होऊ लागले आहे. मात्र यावर्षी शासनाने रेती घाटांचा वेळेवर लिलाव न केल्याने रेतीची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व बांधकाम ठप्प झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो मजूर, शेकडो कंत्राटदार बेकारीचे जीवन जगत आहेत.सुत्राच्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात २०१६ -१७ या आर्थिक वर्षातील २८, २०१७ - १८ या आर्थिक वर्षातील ५० तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षातील ८६ घरकुलांच्या कामांना रेती टंचाईचा फटका बसला असून रेतीअभावी ही कामे बंद असल्याची माहिती आहे. २०१७ - १८ मध्ये रमाई योजनेत मंजुरी मिळालेले ३६ घरकुलांची स्थिती अशीच आहे. घरकुलांप्रमाणेच नागभीड तालुक्यात शौचालयांची कामे बंद आहेत. जवळपास ३६५ शौचालयाचे काम रेतीअभावी बंद असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक ग्रा.प.भवन, रस्त्यांची कामे या रेती टंचाईच्या कचाट्यात सापडली आहेत. केवळ शासकीय कामेच नाही तर खासगी कामेही बंद पडली आहेत.शासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रखडलेले रेती घाटांचे लिलाव तत्काळ करावे, अशी मागणी केली जात आहे.विटा व्यवसायात मंदीया रेती टंचाईचा फटका विटा व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बांधकामेच नसल्याने विटांचा खप मंदावला आहे. परिणामी विटा व्यावसायिकांनी विटांचे उत्पादन कमी केले आहे. एका विटाभट्टीवर जवळपास १०० मजूर काम करतात. अशीच रेती टंचाई राहिली तर भविष्यात या मजुरांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. नागभीड तालुक्यात शेकडोच्या घरात विटाभट्ट्या आहेत, हे विशेष.