शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

दोन दिवसांत १४६ बसेस ४२ हजार कि.मी. धावल्या, हाती पडले केवळ दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST

जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारात एकूण २३५ बसेस लॉकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५०० ते ६०० ...

जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारात एकूण २३५ बसेस लॉकडाऊनपूर्वी धावत होत्या. या बसेसच्या ५०० ते ६०० फेऱ्या होत होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. परंतु, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर निम्म्या बस धावू लागल्या. दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत होते. मात्र मागील काही दिवसांपासून ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यातच शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही बंद करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

बॉक्स

दोन दिवसांत ८० हजार किमीचा प्रवास रद्द

जिल्ह्यातील चारही आगारातून सुमारे ८० हजार किमीपर्यंत बसफेऱ्या धावत होत्या. त्यातून लाखों रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते. मात्र वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ २९ हजार किमी अंतर बस धावली. ४९ हजार किमी अंतराच्या बस रद्द करण्यात आल्या. त्यातून महामंडळाला सहा लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. रविवारी १३ हजार किमी बस धावल्या. ६६ हजार किमी अंतराच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे महामंडळाला केवळ तीन लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन दिवसांत केवळ महामंडळाला नऊ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

बॉक्स

कर्मचारीही कमी

शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बहुतांश कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढा शेड्यूल होता. तेवढे कर्मचारी कामावर होते. नेहमी वाहनचालक व वाहक यांच्या दोनवेळा ड्युटी लावण्यात येत होत्या. मात्र या वीकेंड लॉकडाऊनला बसफेऱ्या कमी असल्याने एकच ड्युटी लावण्यात आली होती.

-----

बॉक्स

२३५ आगारातील एकूण बसेसची संख्या

१४६ दोन दिवसांत धावलेल्या बसेस

९९०००० पैसे मिळाले दोन दिवसांत