शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

बारावीत मुलींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:36 IST

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.

ठळक मुद्देचंद्रपूर तालुका अव्वल : जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २९ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार २७१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यार्पैकी एकूण २५ हजार ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल एक हजार ९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सात हजार १२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १५ हजार ६२० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ५७३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी अधिक असली तर विदर्भात सर्वच जिल्ह्याची निकालाची टक्केवारी चांगली असल्याने जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १५ हजार १५९ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १५ हजार १५० मुले परीक्षेला बसली. यातील १२ हजार ६६४ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.५९ आहे.यासोबतच एकूण १४ हजार १२५ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार १२१ मुलींनी परीक्षा दिली. यातून १२ हजार ७४९ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९०.२८ आहे.विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिकबारावी परीक्षेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून एकूण १० हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १० हजार ९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून १० हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६३६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून तीन हजार ६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेची टक्केवारी ९५.३५ आहे. कला शाखेतून एकूण १४ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार ६५२ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी ११ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ८१.२० आहे. कॉमर्स शाखेतून एकूण दोन हजार ८० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार ७९ विद्यार्थी परीक्षेला बसली. पैकी एक हजार ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कॉमर्स शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.२२ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ३ विद्यार्थ्यांपैकी एक हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ७८.२३ इतकी आहे.शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीणवर मातजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता शहरी विद्यार्थ्यांनी निकालात ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, मूल, नागभीड, भद्रावती या तालुक्यांचा निकाल चांगला लागला आहे. त्या तुलनेत पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यांतील मुले निकालात मागे पडली आहे.सभापती व त्यांचे पुत्र उत्तीर्णजिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी यावर्षी जनता विद्यालय, घुग्घुस येथून बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा दिली होती. यासोबत त्यांचे पुत्र गणेश ब्रिजभूषण पाझारे हाही यावेळी बारावीचा नियमित विद्यार्थी होता. त्याने नागपूर येथील मिल्ट्री भोसला स्कूल येथून बारावीची परीक्षा दिली होती. गणेशने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलीच; सोबतच समाज कल्याण सभापती असलेले त्याचे वडील ब्रिजभूषण पाझारे हेदेखील ५० टक्के गूण घेऊन बारावी उत्तीर्ण झाले आहेत.पोंभूर्णा तालुका पिछाडीवरयंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात चंद्रपूर तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला. या तालुक्याचा निकाल ९०.०९ टक्के लागला. जिवती तालुका ८८.२२ टक्के घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर पोंभूर्णा तालुका पिछाडीवर गेला आहे. या तालुक्याचा निकाल ७०.५० टक्के लागला.