शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

दोन महिन्यात तीनदा बदलले प्रशासक

By admin | Updated: July 2, 2015 01:30 IST

सिंदेवाही ग्रामपंंचायतीमध्ये मागील दोन महिन्यांपासून प्रशासक बसले आहेत. दोन महिन्यात तीनदा प्रशासक बदलले.

सिंदेवाही ग्रामपंचायत : दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार बंद सिंदेवाही : सिंदेवाही ग्रामपंंचायतीमध्ये मागील दोन महिन्यांपासून प्रशासक बसले आहेत. दोन महिन्यात तीनदा प्रशासक बदलले. ग्रामपंचायत सचिव चौधरी यांचीसुद्धा रत्नापूरला बदली झाली. ग्रामपंचायत वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे ग्रामपंंचायतीचे २३ पैकी नियमानुसार सहा कर्मचाऱ्यांचे पगार सुरू आहे. जवळपास १७-१८ कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सिंदेवाही ग्रामपंचायत वाद न्यायालयात सुरू आहे. विरोधी सदस्यांनी न्यायालायत ग्रामपंचायत येथे नियमानुसार कर्मचाऱ्यांचा भरणा जास्त आहे. त्यांच्या पगारावर महिन्याचा तसेच वर्षाचा एवढा खर्च होतो. यावर न्यायालयात प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांचा पगार होत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने ‘लोकमत प्रतिनिधी’ जवळ आपली व्यथा कथन करताना सांगितले. मागील दोन महिन्यांपासून आर्थिक व्यवहार बंद असल्याने दैनंदिन कामे खोळंबली आहे. त्यामुळे शहरातील सहाही वॉर्डात कचऱ्याचे ढिग पडले आहे. नाल्याची सफाई झाली नाही. विद्युत दिवे बंद अवस्थेत पडले आहे. त्यामुळे सिंदेवाही ग्रामपंचायतीचे होणार तरी काय, यावर नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे. तरीही ते काम करीत आहे. दोन या तीन महिन्यात नगरपरिषद किंवा नगर पंचायत होईल, या आशेवर ते आहेत. त्यावेळी आपले पगार वाढेल किंवा समावेश होईल या आशेने ते काम करीत असल्याचे बोलले जाते. सिंदेवाही शहराची शोकांतिका अशी की सध्या येथील विकास कामाला संपूर्ण खीळ बसली आहे. एकही अधिकारी यावर बोलायला तयार नाही. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा ज्येष्ठ नागरिकांनी यावर तोडगा काढून सिंदेवाही ग्रामपंचायत पुर्वपदावर कशी येईल, यावर विचार मंथन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्याय सहन करणारे गाव म्हणजे सिंदेवाही, अशी पूर्वजांनी दिलेली उपमा खरी असल्याचे जाणवू लागले आहे. नागरिकांचे विकासाबद्दल काहीही देणे घेणे नाही. सिंदेवाही गामपंचायतीला ग्रहणातून मुक्त करणार कोण, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)