शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

दीड महिन्यापासून पाणी पुरवठा बंद

By admin | Updated: September 30, 2014 23:35 IST

कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लखमापूर : कोरपना तालुक्यातील भोयगाव-जैतापूर एकोडी या गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना गेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. याचे मुख्य केंद्र गडचांदूर-भोयगाव मार्गावरील कवठाळा येथे आहे. या योजनेद्वारे १७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पाणी पुरवठ्याचा सामना या गावांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. १० वर्षापूर्वी या गावांसाठी सदर पाणी पुरवठा योजना सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाणी पुरवठा झाला व पाणीटंचाई रोखता आली. मात्र त्यानंतर आजतागायत पाईपलाईन, दुरुस्ती, पाईपलाईन विस्तार व गावातील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे नसली तरी ग्रामपंचायतीला कर भरावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक हलबल झाले आहे. या गावातील महिला गावातील सार्वजनिक बोअरवेल, विहिरीतून काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा उपसा करीत आहेत. परंतु पाण्याचा साठा मुबलक नसल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर कुठे एकाच बोअरवेलवर गावातील सर्वच महिला पाण्यासाठी गोळा होत असल्याने तंटे वाढत आहेत. गावातील बोअरवेलही मोळकळीस आल्या आहेत. सदर गाव मुख्य मार्गावर असल्याने व लोकसंख्या बघता पाण्याचा साठा मुबलक असणे गरजेचे आहे. मात्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. (वार्ताहर)