शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

पत्रकबाजीतून न्याय मिळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 22, 2015 01:01 IST

गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमधील उसणवारी व आर्थिक भ्रष्टाचाराचा सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कारवाईत कुचराई केली जात आहे.

गोंडपिपरी : गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमधील उसणवारी व आर्थिक भ्रष्टाचाराचा सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कारवाईत कुचराई केली जात आहे. नागरिकांना जागृत करण्याकरिता पत्रक काढून केलेला प्रकार हा नागरिक हक्क असून असा अधिकार प्रत्येक नागरिकाचा असल्याचे सांगत गोंडपिपरी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ताबडतोब निकाली काढून सरपंच सचिवावर कारवाई करा, अशी मागणी स्थानिक तरुणांनी पत्रकार परिषदेत केली.मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस गणेश डहाळे, संजय झाडे, साईनाथ मास्टे, अश्विन कुसनाके, विनोद वाघाडे, विनोद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रपरिषदेत पुढे बोलताना गणेश डहाळे म्हणाले, गोंडपिपरीचे सरपंच सुनील डोंगरे, सचिव दिलीप शिंदे यांनी ग्रामपंचायतीमधील पर्यावरण समृद्धी निधीचा गैरवापर, मुरुमातील रकमेचा अपहार, सामान्य फंड, पाणी पुरवठा फंड या विविध विकास निधीतून मोठ्या प्रमाणात उसणवार घेऊन अनियमितता केली. शासन पत्रक १२ जून २०१३ अन्वये व्यवहारात अनियमितता करणे हा आर्थिक गुन्हा असून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे नमूद असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच सदर ग्रामपंचायतीवरील नागपूर आयुक्त (चौकशी) यांच्याकडे सादर केलेले प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात आहे. सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केवळ तीन महिन्यांचा अवधी दिल्यानंतरही केवळ दप्तर दिरंगाईतून कारवाईत कुचराई केली जात असल्याचा आरोपही डहाळे यांनी केला.पत्रकबाजीचे आंदोलन हे जनजागृतीसाठी असून यात कुठलेही राजकीय षडयंत्र नसल्याचे सांगत सरपंच, सचिवांनी जनतेसमक्ष येऊन फेटाळलेल्या आरोपाचा आढावा द्यावा, असे आव्हानही गणेश डहाळे व सहकाऱ्यांनी केले आहे. गत तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही प्रकरण निकाली का काढण्यात आले नाही असा सवालही उपस्थित केला. (तालुका प्रतिनिधी)