शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पत्रकबाजीतून न्याय मिळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 22, 2015 01:01 IST

गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमधील उसणवारी व आर्थिक भ्रष्टाचाराचा सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कारवाईत कुचराई केली जात आहे.

गोंडपिपरी : गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमधील उसणवारी व आर्थिक भ्रष्टाचाराचा सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कारवाईत कुचराई केली जात आहे. नागरिकांना जागृत करण्याकरिता पत्रक काढून केलेला प्रकार हा नागरिक हक्क असून असा अधिकार प्रत्येक नागरिकाचा असल्याचे सांगत गोंडपिपरी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ताबडतोब निकाली काढून सरपंच सचिवावर कारवाई करा, अशी मागणी स्थानिक तरुणांनी पत्रकार परिषदेत केली.मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस गणेश डहाळे, संजय झाडे, साईनाथ मास्टे, अश्विन कुसनाके, विनोद वाघाडे, विनोद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रपरिषदेत पुढे बोलताना गणेश डहाळे म्हणाले, गोंडपिपरीचे सरपंच सुनील डोंगरे, सचिव दिलीप शिंदे यांनी ग्रामपंचायतीमधील पर्यावरण समृद्धी निधीचा गैरवापर, मुरुमातील रकमेचा अपहार, सामान्य फंड, पाणी पुरवठा फंड या विविध विकास निधीतून मोठ्या प्रमाणात उसणवार घेऊन अनियमितता केली. शासन पत्रक १२ जून २०१३ अन्वये व्यवहारात अनियमितता करणे हा आर्थिक गुन्हा असून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे नमूद असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच सदर ग्रामपंचायतीवरील नागपूर आयुक्त (चौकशी) यांच्याकडे सादर केलेले प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात आहे. सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केवळ तीन महिन्यांचा अवधी दिल्यानंतरही केवळ दप्तर दिरंगाईतून कारवाईत कुचराई केली जात असल्याचा आरोपही डहाळे यांनी केला.पत्रकबाजीचे आंदोलन हे जनजागृतीसाठी असून यात कुठलेही राजकीय षडयंत्र नसल्याचे सांगत सरपंच, सचिवांनी जनतेसमक्ष येऊन फेटाळलेल्या आरोपाचा आढावा द्यावा, असे आव्हानही गणेश डहाळे व सहकाऱ्यांनी केले आहे. गत तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही प्रकरण निकाली का काढण्यात आले नाही असा सवालही उपस्थित केला. (तालुका प्रतिनिधी)