शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पाणीपट्टीमुळे अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:07 IST

यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचे दुर्लक्ष : ३५ प्रादेशिक नळयोजना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच थकीत करामुळे अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जिल्ह्यातील जवळपास दोनशे पाणी पुरवठा योजनांकडे आठ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्तीसाठी राज्य शासन दरवर्षी तीन ेकोटींचा निधी देते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निधी राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यातच थकबाकीही वसूल होत नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे चंद्रपूर, चिमूर, राजुरा आणि सिंदेवाही असे उपविभाग आहेत. या सर्वच उपविभागाचे पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू असले तरी ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळत नसल्याने या विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतींना थकबाकीसाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्षच होत आहे.वसूल रकमेतून विकास कामांवर खर्चजि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक नळयोजना चालविल्या जातात. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. तर पाणीपट्टीची थकबाकी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. एकूण रकमेपैकी ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द करावी लागते. उर्वरित २० टक्के रकम गावातील विकासकामे करण्यावर अभिप्रेत आहे. मात्र, ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल केल्यानंतर ती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे न देता विकास कामावरच खर्च करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.