शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

थकीत पाणीपट्टीमुळे अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:07 IST

यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचे दुर्लक्ष : ३५ प्रादेशिक नळयोजना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीच्या कमी पावसामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच थकीत करामुळे अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जिल्ह्यातील जवळपास दोनशे पाणी पुरवठा योजनांकडे आठ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्तीसाठी राज्य शासन दरवर्षी तीन ेकोटींचा निधी देते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निधी राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यातच थकबाकीही वसूल होत नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे चंद्रपूर, चिमूर, राजुरा आणि सिंदेवाही असे उपविभाग आहेत. या सर्वच उपविभागाचे पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू असले तरी ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळत नसल्याने या विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतींना थकबाकीसाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्षच होत आहे.वसूल रकमेतून विकास कामांवर खर्चजि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक नळयोजना चालविल्या जातात. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. तर पाणीपट्टीची थकबाकी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. एकूण रकमेपैकी ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्द करावी लागते. उर्वरित २० टक्के रकम गावातील विकासकामे करण्यावर अभिप्रेत आहे. मात्र, ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल केल्यानंतर ती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे न देता विकास कामावरच खर्च करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.