शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कुसुंबीच्या आदिवासींना न्याय मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुसूंबी गाव भुसंपादन, पुनर्वसन व मुलभुत अधिकारापासून वंचित आहे. माणिकगड सिमेंट लाईम स्टोन कंपनीच्या भुसंपादन व पुनर्वसन प्रकरणाची चौकशी करून....

ठळक मुद्देसंजय धोटे : आदिवासी कोलामांच्या धरणे मंडपाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुसूंबी गाव भुसंपादन, पुनर्वसन व मुलभुत अधिकारापासून वंचित आहे. माणिकगड सिमेंट लाईम स्टोन कंपनीच्या भुसंपादन व पुनर्वसन प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही व इतर मागण्यांसाठी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांच्या नेतृत्वात अन्याग्रस्त ३४ आदिवासी कोलाम कुटुंबियांनी १६ एप्रिल रोजी स्थानिक पेट्रोल पंप चौक येथे एक दिवसीय धरणे केले. या धरणे आंदोलनाला भेट देऊन आदिवासींच्या मागण्या शासनस्तरावरून सोडविल्या जातील, असे आश्वासन आ. संजय धोटे यांनी दिले.आंदोलनकर्त्या आदिवासींनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव, वनविभागाचे सचिव, उद्योग विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी पाठविले आहे. आदिवासी मालकी हक्काच्या जमिनीवरून गौण चुनखडी उत्पन्नाचा २५ टक्के वाटा जमिनधारकांना द्यावा, कुसूंबी येथील जमिनीचा मोबदला बाजार भावाने द्यावा, पुनर्वसन विस्थापीत अनुदान प्रती कुटुंब १० लाख रूपये द्यावा, जमिनधारक कुटुंबाच्या व्यक्तीला कंपनीत नोकरी द्यावी, माईन्स अ‍ॅन्ड मिनरल रेग्युलेशन एॅक्ट १९५७ अंतर्गत लॅड लिज तथा प्रथम माईनिंग उत्खनन, जल व अंमलनाला जलसाठ्यामुळे झालेल्या परिणामाची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त कुटुंबानी केली आहे.दरम्यान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी आदिवासी कोलामांच्या धरणे मंडपाला भेट दिली असता, त्यांनी आंदोलन कर्त्याशी चर्चा केली. आदिवासी कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित होते.मागण्यांची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.