शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास- चंद्रभान पराते

By admin | Updated: January 24, 2015 00:33 IST

संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.

चंद्रपूर: संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.आदिवासी माना समाजाच्यावतीने स्थानिक मॉ माणिकादेवी मंदिर परिसरात आयोजित समाजाच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समाजसेवक आडकु नन्नावरे तर प्रमुख अतिथी म्हणून माना समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार उपस्थित होते.पराते पुढे म्हणाले, संविधानाच्या यादीमध्ये ज्या-ज्या जमातींचा समावेश आहे. त्यांपैकी काही जमातींना ३० ते ४० वर्षापासून असली-नकलीच्या वादात अडकवून ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा इतिहास आहे. या आदिवासींचा विकास निधी विदर्भातून पळवून नेण्यात आला. आदिवासींच्या नावावर केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी आदिवासींवर खर्च होत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होण्यास अडचण झाली. ज्येष्ठ समाजसेवक आडकुजी नन्नावरे यांनी समाजाने राजकीय शक्ती उभी करावी तर माना आदिवासी समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार यांनी एका झेंड्याखाली एकत्र येवून माना समाजाची शक्ती उभी दिसली पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यााठी विठ्ठल ढोक, प्रभाकर गुडधे, नथ्यू झाडे, देवराव सोनावणे, सुभाष नन्नावरे, कल्पना घरत, रेखा ढोक, उमा दोडके, लक्ष्मीबाई गजभे यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)