शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाला ‘त्या’ अध्यादेशातून वगळले

By admin | Updated: July 29, 2014 23:44 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू करणे व शिक्षक भरती करणे असा अध्यादेश सर्वच क्षेत्रात सुरू झाला.

पेंढरी (कोके) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू करणे व शिक्षक भरती करणे असा अध्यादेश सर्वच क्षेत्रात सुरू झाला. परंतु आदिवासी विभागाला आरटीई लागू करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आरटीई लागू करण्यासाठी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.प्राशातू-१११२/२५९/ २०१२ प्रा.शि-३, दि. १३ फेब्रुवारी २०१३ व शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. विभशा २०१३/ प्र. १७२/१/ विजाभज- २ दि. ७ जून २०१३ व १३ जून, २०१४ नुसार १ ते ४ वर्ग आहेत व एक किमीच्या आत ५ वा वर्ग नाही, अशा ठिकाणी ५ वर्ग व तीन किमीच्या आत आठवा वर्ग नाही, अशा ठिकाणी जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अनुक्रमे ५ वा व ८ वा वर्ग जोडण्याचे व त्यासाठी शिक्षक भरतीचे शासनाचे अध्यादेश आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या त्या अध्यादेशात राज्यातील आदिवासी विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे काही आदिवासी आश्रमशाळा संस्थापक मुख्याध्यापक व शिक्षक पुढील वर्ग सुरू करायचे की नाही, या संभ्रमात असून शिक्षक भरतीअभावी कर्मचाऱ्यांचे तथा बेरोजगारांचे नुकसान होत आहे.तसेच आरटीई २००९ नुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या प्रत्येक वर्गातील निवासी व अनिवासी (बहिस्त) विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गुणोत्तर प्रमाण सदर अधिनियमाचे परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये अतिरिक्त घोषित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे व आवश्यकता असल्यास नवीन पदांचा प्रस्ताव शासनास सादर करावा. आश्रमशाळांना नवीन पदांना मंजुरी देऊ नये, असे अध्यादेशात स्पष्ट नमूद केले आहे. परंतु हा अध्यादेश शिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग यांनाच लागू असल्यामुळे आदिवासी विभाग जीआरबाबत संभ्रमात पडला आहे. (वार्ताहर)