शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

By admin | Updated: May 10, 2017 00:43 IST

राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून ....

सुधीर मुनगंटीवार : विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्व शासकीय यंत्रणेने हे काम मिशनमोड स्वरूपात हाती घ्यावे. तसेच कामाचे नियोजन व आतापर्यंत केलेले काम वन विभागाने दिलेल्या नमून्यात संकेतस्थळावर अपलोड करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुणे, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या वृक्ष लागवडी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.वसुंधरेचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार आहे यामध्ये वन विभागामार्फत २.२५ कोटी, इतर शासकीय विभागांकडून ७५ लाख आणि ग्रामपंचायतींकडून १ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगवण्यावर ही भर दिला जावा, असे सांगून ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही निधी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले. अनेक बँकांकडून ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून पैसे मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग मिळवावा, यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जावी, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, यामध्ये शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक- अध्यात्मिक संस्था, स्वंयसेवी संस्था, स्काऊट-गाईड, रोटरी, यांचेदेखील सहकार्य घेण्यात यावे. वृक्ष लागवडीत व्यक्ती-संस्थांना बक्षीस देणार- सुधीर मुनगंटीवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षलागवडीची मनामनात ज्योत पेटवताना या सर्वांसोबत शासकीय यंत्रणेने एक वृक्ष सहकार निर्माण करावा. यासाठी गावागावात वातावरण निर्मिती केली जावी. वृक्ष लागवडीची घोषवाक्ये, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित व्हावी,गावात वृक्ष दिंडी काढली जावी. वृक्ष लागवडीच्या कामात सर्व पक्षीय लोकांचा सहभाग घेण्यात यावा. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांची नावे विभागाकडे कळविण्यात यावीत. त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र विभागाकडून दिले जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.वन विभाग हा या कार्यक्रमात सर्वांसाठी समन्वयक आहे. या विभागाने सर्वांना सोबत घेऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा. प्रत्येक जिल्ह्यात या कामासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त केलेल्या समन्वयकांची माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध केली जावी. वृक्ष लागवडीच्या जागांची निश्चिती व्हावी, जिथे वृक्ष लावायचे तिथले खड्डे हे योग्य आकाराचे असावेत असे सांगतांना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छोटछोट्या गोष्टींची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.राज्यात होणा?्या वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करावे अशा सूचना वनसचिव विकास खारगे यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की प्रत्येक विभागात वनमंत्री पालकमंत्र्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वृक्षलागवडीसंदर्भात बैठका घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या ठिकाणी वृक्ष लावायचे त्या जागांची निश्चिती होणे, समन्वयकांची पुस्तिका प्रकाशित होणे, खड्डे खोदण्याचे काम पूर्ण होणे आणि यासंदर्भात केलेले नियोजन पूर्णत्वाला जाणे आवश्यक आहे. याकामात लोकांना सहभागी करून घेतांना जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या चार पत्रकार परिषदा घ्याव्यात, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन वृक्ष लागवडीपूर्वीच्या छोट्या-मोठ्या घटनांची माहिती बातमी, लेख स्वरूपात दिली जावी आणि महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी या क्षेत्रात प्रेरणादायी काम करून दाखवावे, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी रोहयो यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.गतवर्षी लावलेल्या रोपांमधील जगलेल्या रोपांमध्ये वन विभागांच्या रोपांची टक्केवारी ही ८० टक्क््यांहून अधिक असल्याची माहिती या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देण्यात आली. यावर्षीच्या ४ कोटी वृक्ष लागवडीचे काम अंतिम टप्प्यात असून रोपवाटिकांमधून दर्जदार रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.