शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

ताडाळी टोलनाका बंदीमुळे प्रवाशांत आनंद

By admin | Updated: March 29, 2015 01:15 IST

चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे ...

घोडपेठ : चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसोबतच खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांतही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.ताडाळी व ऊर्जाग्राम येथील प्रत्येकी एक व चंद्रपूर शहरातील दोन उड्डाणपुलांची टोलवसुली ताडाळी येथील टोलनाक्यावरून सुरु होती. ३२ कोटी रुपये खर्चून हे चार रेल्वे उड्डाणपुल बांधण्यात आले होते. मात्र बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या या टोलनाक्याची वसुली पुर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करून प्रत्येक वेळी या टोलनाक्याची मुदत वाढविण्यात येत होती. २०२७ पर्यंत या टोलनाक्यावरून वसुलीची मुदत देण्यात आली होती. मात्र विधान परिषद सदस्या शोभाताई फडणविस यांनी स्वत: टोलनाक्याला भेट देवून पाहणी केली. या भेटीदरम्यान नाक्यावरील कर्मचारी बोगस पावत्या प्रवाशांना वितरित करीत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. २० टक्के संगणकीय पावत्या व उरलेल्या छापिल बोगस पावत्या वाहनधारकांना सर्रास वितरीत केल्या जात होत्या. या साऱ्या प्रकाराला आ.फडणवीस यांनी प्रखर विरोध केला. मुंबईस्थित सहकार ग्लोबल लिमी. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताडाळी टोलनाका रद्द करण्याच्या आदेशाबद्दल न्यायालयात अपील करून १ डिसेंबर २०१४ ला स्थगिती आणली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जो आर्थिक भुर्दंड बसत होता त्याला लगाम लागला आहे. (वार्ताहर)