शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

ताडाळी टोलनाका बंदीमुळे प्रवाशांत आनंद

By admin | Updated: March 29, 2015 01:15 IST

चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे ...

घोडपेठ : चंद्रपूर-भद्रावती महामार्गावरील मागील दोन दशकांपासून सुरू असलेला ताडाळी येथील टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसोबतच खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांतही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.ताडाळी व ऊर्जाग्राम येथील प्रत्येकी एक व चंद्रपूर शहरातील दोन उड्डाणपुलांची टोलवसुली ताडाळी येथील टोलनाक्यावरून सुरु होती. ३२ कोटी रुपये खर्चून हे चार रेल्वे उड्डाणपुल बांधण्यात आले होते. मात्र बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या या टोलनाक्याची वसुली पुर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करून प्रत्येक वेळी या टोलनाक्याची मुदत वाढविण्यात येत होती. २०२७ पर्यंत या टोलनाक्यावरून वसुलीची मुदत देण्यात आली होती. मात्र विधान परिषद सदस्या शोभाताई फडणविस यांनी स्वत: टोलनाक्याला भेट देवून पाहणी केली. या भेटीदरम्यान नाक्यावरील कर्मचारी बोगस पावत्या प्रवाशांना वितरित करीत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. २० टक्के संगणकीय पावत्या व उरलेल्या छापिल बोगस पावत्या वाहनधारकांना सर्रास वितरीत केल्या जात होत्या. या साऱ्या प्रकाराला आ.फडणवीस यांनी प्रखर विरोध केला. मुंबईस्थित सहकार ग्लोबल लिमी. या कंपनीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताडाळी टोलनाका रद्द करण्याच्या आदेशाबद्दल न्यायालयात अपील करून १ डिसेंबर २०१४ ला स्थगिती आणली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जो आर्थिक भुर्दंड बसत होता त्याला लगाम लागला आहे. (वार्ताहर)