शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
3
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
5
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
6
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
7
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
8
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
9
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
10
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
11
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
12
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
13
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
14
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
15
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
16
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
17
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
18
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
19
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
20
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?

गुडघाभर पाण्यातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:30 IST

एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देपाटागुड्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचीही जीवघेणी कसरत

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.४० ते ५० वर्षांपासून वास्तवात असलेल्या पाटागुड्यात गोंड व कोलाम समाजाची दीडशे घरांची वस्ती आहे. संपूर्ण दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाच्या कुठल्याच सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. गुड्यात एक सिंमेट रस्ता आणि हातपंप वगळला तर शासनाच्या कुठल्याच योजनेतील विकासगंगा अवतरली नसल्याचे चित्र आज बघायला मिळते. आजही येथील नागरिकांना वीज, पाणी, आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न भेडसावतो आहे. गावात शाळाही नाही.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षरस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी अनेकवेळा संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकवेळा रस्त्याचे काम करून मिळावे म्हणून ठरावही घेतले. मात्र कुठल्याच नेत्याला किंवा अधिकाºयाला पाझर फुटला नाही. निवडणुका आल्या की मतदारांना आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपल्या की तीच आश्वासने विसरून जायची. ही परंपरा असल्याने पाटागुड्यातील आदिवासी बांधवाचा विकास खुंटला जात आहे.आरोग्य सुविधा शून्यजायला रस्ता नाही. गावात आरोग्याच्या सोईसुविधा नाही आणि पावसाळ्यात एखाद्याचे आरोग्य बिघडले तर दिवसा कसेही रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचवता येईल. पण रात्री रूग्णांना उपचारासाठी नेणे कठीण आहे. कधी बैलबंडीने तर कधी पायी चालत रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावे लागते. पावसाळ्याचे चार महिने तर नागरिकावर संकटच असते.