शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

गुडघाभर पाण्यातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:30 IST

एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देपाटागुड्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचीही जीवघेणी कसरत

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करीत असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खेड्यातील आदिवासी बांधवाच्या नशिबी मात्र छदामही मिळाले नाही. कधी काळी तयार केलेला रस्ता व अरुंद पाईपाचा पूलही आठवडाभर झालेल्या संततधार पावसात वाहून गेल्याने पाटागुड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.४० ते ५० वर्षांपासून वास्तवात असलेल्या पाटागुड्यात गोंड व कोलाम समाजाची दीडशे घरांची वस्ती आहे. संपूर्ण दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाच्या कुठल्याच सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. गुड्यात एक सिंमेट रस्ता आणि हातपंप वगळला तर शासनाच्या कुठल्याच योजनेतील विकासगंगा अवतरली नसल्याचे चित्र आज बघायला मिळते. आजही येथील नागरिकांना वीज, पाणी, आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न भेडसावतो आहे. गावात शाळाही नाही.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षरस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी अनेकवेळा संबंधित लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकवेळा रस्त्याचे काम करून मिळावे म्हणून ठरावही घेतले. मात्र कुठल्याच नेत्याला किंवा अधिकाºयाला पाझर फुटला नाही. निवडणुका आल्या की मतदारांना आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपल्या की तीच आश्वासने विसरून जायची. ही परंपरा असल्याने पाटागुड्यातील आदिवासी बांधवाचा विकास खुंटला जात आहे.आरोग्य सुविधा शून्यजायला रस्ता नाही. गावात आरोग्याच्या सोईसुविधा नाही आणि पावसाळ्यात एखाद्याचे आरोग्य बिघडले तर दिवसा कसेही रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचवता येईल. पण रात्री रूग्णांना उपचारासाठी नेणे कठीण आहे. कधी बैलबंडीने तर कधी पायी चालत रूग्णांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावे लागते. पावसाळ्याचे चार महिने तर नागरिकावर संकटच असते.