शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

हल्लेखोर बिबट अडकला पिंजऱ्यात

By admin | Updated: October 22, 2015 00:45 IST

गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.

सावली : गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.११ आॅक्टोबर रोजी खेडी येथील सुकरू बुका कंकलवार यांच्या बकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने २१ बकऱ्या ठार मारल्या. तर बंडु पोचू येरेवार यांची एक शेळी मारली. त्यानंतर १८ आॅक्टोबरला पुन्हा खेडी येथीलच गणेश रामा कंचलवार यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्या ठार केल्या. तेव्हापासून पुढील अनर्थ होऊ नये म्हणून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार पिंजरे लावले होते. त्यापैकी भवराळा गावाजवळील आसोला मेंढा नहरालगत असलेल्या पिंजऱ्यामध्ये सदर बिबट रात्री ११ वाजताच्या दरम्यान अडकला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बिबट्याच्या दहशतीत असलेल्या खेडी येथील मेंढपाळ कुटुंबीयांनी वनविभागाचे आभार मानले. अडीच ते तीन वर्षे वय असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बकऱ्यांच्या मालकाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक बकरीचे तीन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड यांनी सांगितले. सदर बिबट्याची रवानगी चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत करण्यात आली असून त्याची आरोग्य तपासणी करून योग्य ठिकाणी सोडण्यात येईल असे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले. उपविभागीय वनाधिकारी एस.एस. पाटील व सहाय्यक वनसंरक्षक डब्ल्यू.व्ही. मोरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे, एस.डी. येलकेवाड, विजय रामटेके, राजू कोडापे यांचेसह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)