शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:41 AM

गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ...

ठळक मुद्देआत्मविश्वास वाढला : गावात लोकसहभागातून ५० लाखांचे काम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, या उद्देशाने भादुर्णीवासीयांनी श्रमदानातून गाव विकास साधण्याचा निर्णय घेतला आहे. गावात लोकसहभागातून तब्बल ५० लाख रुपयांचे काम करुन गाव विकासाला हातभार लावला आहे. प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने विशेष जनजागृती केल्याने गावाचा कायापालट होण्याला मदत मिळाली.‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे लोकांना श्रमदानाचे महत्व पटले तर गावाचा विकास होण्याला कुणीही रोखू शकत नाही. मूल तालुक्यातील भादुर्णी या गावाची लोकसंख्या एक हजार ५१६ असून प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने गाव विकासासाठी जनजागृती करुन लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावातील युवक- युवती व वृद्धांना सोबत घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, आदर्श ग्राम निर्मितीकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौच खड्ड्याद्वारे पाण्याची पातळी वाढविणे, घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचा शेतबाग, परसबाग फुलविणे, गोठ्यातील गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मलमुत्राचा वापर शेतात करुन शेती पिकासाला हातभार लावण्याचा प्रयत्नकरण्यात आला. घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलनीकरण करुन खताची निर्मिती करण्याविषयी तंत्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभु फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, सरपंच दिपीका शेंडे, उपसरपंच संतोष रेगुंडवार, सचिव अंकुश दडमल, स्वच्छता समितीचे अध्यक्ष लिलाधर शेंडे, प्रभुदास मांदाडे, अविनाश शेंडे, गोपाल सोनुले, अंकुश बावणे, अतुल बावणे व गावकरी गावविकासासाठी झटत आहेत.गावात लागले सीसीटीव्ही कॅमरेगावात श्रमदान व लोक वर्गणी गोळा करुन स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात सर्वत्र स्वच्छता व आरोग्यदायी वातावरणांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलां. ग्रामपंचायतीकडून गावातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले. सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले. शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाडीत ओला व सुका कचरा याचे विघटन करुन ओल्या कचºयापासून खत तयार करण्यात येत आहे.