शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:41 IST

गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ...

ठळक मुद्देआत्मविश्वास वाढला : गावात लोकसहभागातून ५० लाखांचे काम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, या उद्देशाने भादुर्णीवासीयांनी श्रमदानातून गाव विकास साधण्याचा निर्णय घेतला आहे. गावात लोकसहभागातून तब्बल ५० लाख रुपयांचे काम करुन गाव विकासाला हातभार लावला आहे. प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने विशेष जनजागृती केल्याने गावाचा कायापालट होण्याला मदत मिळाली.‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे लोकांना श्रमदानाचे महत्व पटले तर गावाचा विकास होण्याला कुणीही रोखू शकत नाही. मूल तालुक्यातील भादुर्णी या गावाची लोकसंख्या एक हजार ५१६ असून प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने गाव विकासासाठी जनजागृती करुन लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावातील युवक- युवती व वृद्धांना सोबत घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, आदर्श ग्राम निर्मितीकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौच खड्ड्याद्वारे पाण्याची पातळी वाढविणे, घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचा शेतबाग, परसबाग फुलविणे, गोठ्यातील गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मलमुत्राचा वापर शेतात करुन शेती पिकासाला हातभार लावण्याचा प्रयत्नकरण्यात आला. घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलनीकरण करुन खताची निर्मिती करण्याविषयी तंत्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभु फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, सरपंच दिपीका शेंडे, उपसरपंच संतोष रेगुंडवार, सचिव अंकुश दडमल, स्वच्छता समितीचे अध्यक्ष लिलाधर शेंडे, प्रभुदास मांदाडे, अविनाश शेंडे, गोपाल सोनुले, अंकुश बावणे, अतुल बावणे व गावकरी गावविकासासाठी झटत आहेत.गावात लागले सीसीटीव्ही कॅमरेगावात श्रमदान व लोक वर्गणी गोळा करुन स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात सर्वत्र स्वच्छता व आरोग्यदायी वातावरणांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलां. ग्रामपंचायतीकडून गावातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले. सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले. शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाडीत ओला व सुका कचरा याचे विघटन करुन ओल्या कचºयापासून खत तयार करण्यात येत आहे.