शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:41 IST

गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ...

ठळक मुद्देआत्मविश्वास वाढला : गावात लोकसहभागातून ५० लाखांचे काम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, या उद्देशाने भादुर्णीवासीयांनी श्रमदानातून गाव विकास साधण्याचा निर्णय घेतला आहे. गावात लोकसहभागातून तब्बल ५० लाख रुपयांचे काम करुन गाव विकासाला हातभार लावला आहे. प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने विशेष जनजागृती केल्याने गावाचा कायापालट होण्याला मदत मिळाली.‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे लोकांना श्रमदानाचे महत्व पटले तर गावाचा विकास होण्याला कुणीही रोखू शकत नाही. मूल तालुक्यातील भादुर्णी या गावाची लोकसंख्या एक हजार ५१६ असून प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने गाव विकासासाठी जनजागृती करुन लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावातील युवक- युवती व वृद्धांना सोबत घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, आदर्श ग्राम निर्मितीकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौच खड्ड्याद्वारे पाण्याची पातळी वाढविणे, घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचा शेतबाग, परसबाग फुलविणे, गोठ्यातील गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मलमुत्राचा वापर शेतात करुन शेती पिकासाला हातभार लावण्याचा प्रयत्नकरण्यात आला. घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलनीकरण करुन खताची निर्मिती करण्याविषयी तंत्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभु फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, सरपंच दिपीका शेंडे, उपसरपंच संतोष रेगुंडवार, सचिव अंकुश दडमल, स्वच्छता समितीचे अध्यक्ष लिलाधर शेंडे, प्रभुदास मांदाडे, अविनाश शेंडे, गोपाल सोनुले, अंकुश बावणे, अतुल बावणे व गावकरी गावविकासासाठी झटत आहेत.गावात लागले सीसीटीव्ही कॅमरेगावात श्रमदान व लोक वर्गणी गोळा करुन स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात सर्वत्र स्वच्छता व आरोग्यदायी वातावरणांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलां. ग्रामपंचायतीकडून गावातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले. सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले. शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाडीत ओला व सुका कचरा याचे विघटन करुन ओल्या कचºयापासून खत तयार करण्यात येत आहे.