शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना डोकेदुखी

By admin | Updated: February 25, 2015 01:29 IST

तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत.

बल्लारपूर : तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत. त्यामुळे विसापूर गावाची दोन भागात विभागणी झाली. या रेल्वेलाईनवरुन दररोज शेकडो रेल्वे गाड्या धावतात. परिणामी येथील रेल्वे फाटक नेहमीच कुलूप बंद राहत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे. विसापूरची लोकसंख्या १५ हजारांवर आहे. गावातून तीन रेल्वे लाईन गेल्याने दर मिनीटाला रेल्वे फाटक बंद असते. यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गावाची विभागणी दोन भागात झाल्याने येथील नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहेत. अशातच विसापूर फाट्यावर टोल नाका सुरू झाल्याने बल्लारपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता येथून ये-जा करीत असल्याने वाहतूक वाढली आहे. याचा फटका रेल्वे फाटकांमुळे प्रवाशांना व वाहन चालकांना बसत आहे.गावकऱ्यांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली. आता लवकरच ग्रामपंचायतीजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून रुग्णांना रेल्वे फाटकाचा त्रास होणार आहे. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने यापूर्वी ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे अपघाताला सामोरे जाऊन जीव गमवावा लागला आहे.मात्र या गंभीर समस्येकडे आजतागायत कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. आतातरी किमान ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)अपघात वाढलेविसापूर येथे तीन रेल्वे मार्ग आहेत. दर दिवशी येथील तीनही रेल्वे मार्गावरुन शेकडोवर रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. या रेल्वे मार्गामुळे विसापूर हे गाव दोन भागात विभागले गेले आहे. मध्ये रेल्वे फाटक आहे. त्यातून नागरिकांची ये-जा सुरू असते. अपघातांच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांसोबतच वाहन चालकांना त्रासाला बळी पडावे लागत आहेत. उड्डाण पुलाची गरजविसापूर या गावात १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. विसापूर येथील दोनही भागातील नागरिकांना या रेल्वे फाटकातूनच ये-जा करावी लागते. याव उपाययोजना म्हणून व दोन भागाना जोडणारा दुवा म्हणून रेल्वे लाईन दरम्यान उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.