शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना डोकेदुखी

By admin | Updated: February 25, 2015 01:29 IST

तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत.

बल्लारपूर : तालुक्यात विसापूर हे सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथून चेन्नई-दिल्ली, दिल्ली- चेन्नई व बल्लारशाह- गोंदिया या तीन रेल्वे लाईन आहेत. त्यामुळे विसापूर गावाची दोन भागात विभागणी झाली. या रेल्वेलाईनवरुन दररोज शेकडो रेल्वे गाड्या धावतात. परिणामी येथील रेल्वे फाटक नेहमीच कुलूप बंद राहत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे. विसापूरची लोकसंख्या १५ हजारांवर आहे. गावातून तीन रेल्वे लाईन गेल्याने दर मिनीटाला रेल्वे फाटक बंद असते. यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गावाची विभागणी दोन भागात झाल्याने येथील नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहेत. अशातच विसापूर फाट्यावर टोल नाका सुरू झाल्याने बल्लारपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता येथून ये-जा करीत असल्याने वाहतूक वाढली आहे. याचा फटका रेल्वे फाटकांमुळे प्रवाशांना व वाहन चालकांना बसत आहे.गावकऱ्यांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली. आता लवकरच ग्रामपंचायतीजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून रुग्णांना रेल्वे फाटकाचा त्रास होणार आहे. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने यापूर्वी ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे अपघाताला सामोरे जाऊन जीव गमवावा लागला आहे.मात्र या गंभीर समस्येकडे आजतागायत कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. आतातरी किमान ये-जा करणाऱ्या नागरिकांना रेल्वे फाटकाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)अपघात वाढलेविसापूर येथे तीन रेल्वे मार्ग आहेत. दर दिवशी येथील तीनही रेल्वे मार्गावरुन शेकडोवर रेल्वे गाड्यांचे आवागमन होते. या रेल्वे मार्गामुळे विसापूर हे गाव दोन भागात विभागले गेले आहे. मध्ये रेल्वे फाटक आहे. त्यातून नागरिकांची ये-जा सुरू असते. अपघातांच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांसोबतच वाहन चालकांना त्रासाला बळी पडावे लागत आहेत. उड्डाण पुलाची गरजविसापूर या गावात १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. विसापूर येथील दोनही भागातील नागरिकांना या रेल्वे फाटकातूनच ये-जा करावी लागते. याव उपाययोजना म्हणून व दोन भागाना जोडणारा दुवा म्हणून रेल्वे लाईन दरम्यान उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.