लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील हिंदी सिटी शाळा, लोकमान्य कन्या व लोकमान्य विद्यालय या तिन्ही शाळा शहरातील मुख्य रस्त्यावर आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत प्रवेश करावा लागतो.कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत.म. गांधी मार्गावर लोकमान्य कन्या विद्यालय व लोकमान्य विद्यालय ही दोन विद्यालय आहे. तर कस्तुरबा मार्गावर हिंदी सिटी विद्यालय आहेत. या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या म्हणजेच सकाळी १० वाजता आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी ५ वाजता यावेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. तसेच यावेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी व पदचाऱ्यांची गर्दी असते.या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता शोधत आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते. परिणामी अपघाताची शक्यता आहे.शिक्षक दाखवतात मार्गविद्यार्थी सुरळीत शाळेत यावे व घरी जावे यासाठी शाळेतील शिक्षकांना हातात विसल घेऊन मुख्य रस्त्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना मार्ग दाखवावा लागत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासोबत त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रयास करीत आहेत.वाहतूक शिपाई नेमण्याची मागणीम. गांधी मार्ग व कस्तुरबा गांधी मार्गावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत.या मार्गावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर वाहतूक शिपाई नेमावा.
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत. म. गांधी मार्गावर लोकमान्य कन्या विद्यालय व लोकमान्य विद्यालय ही दोन विद्यालय आहे.
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
ठळक मुद्देअतिक्रमणामुळे रस्ते अरुंद : चंद्रपूर शहरातील वास्तव