शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतीच्या बांधापर्यंत जाणार ट्रॅक्टर, अनेक रस्त्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:37 IST

मातोश्री पाणंद रस्ते योजना : काही कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावातील रस्ते हे सुस्थितीत असतील तर गावाचा विकास साधला जातो. त्याचबरोबर शेतीकडे जाणारे रस्तेही सुस्थितीत असतील तर शेतीतून अर्थकारणाला चालना मिळते. मातोश्री पाणंद योजनेंतर्गत शेतावर जाणाऱ्या रस्त्यांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री पक्का रस्ता असल्यास शेतावर नेण्यास सोयीचे होते.

जिल्ह्यात अनेक गावांतील पाणंद रस्ते मंजूर झाले असून काहींचे काम सुरू झाले आहे. तर काही रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. पाणंद रस्ते झाले तर पारंपरिक शेतीमुळे करावी लागणारी मेहनत कमी होईल तसेच शेतीची कामे वेळेत होतील याचा फायदा बळीराजाला होणार आहे. मात्र ही योजना राबविताना ग्रामीण भागात काही अडचणींचाही सामना करावा लागत आहे.

काय आहे मातोश्री पाणंद योजना?

  • यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये बहुसंख्य कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्याने या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्याकरिता बारमाही वापराकरिता शेत, पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे.
  • त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.

यंत्र नेणे होते अवघड

  • शेताकडे जाणारे रस्ते हे पायवाट किंवा कच्चे असतात. त्यामुळे शेतात यंत्र घेऊन जाणे किवा शेतमाल नेणे आणणे अवघड जाते. यासाठी शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत अनेक रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

शेत रस्त्यांचे भाग्य उजाळणार

  • जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. या तालुक्यातील काही गावांत आजही पाणंद रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातून शेतात जावे लागते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे.

नागरिकांचा विरोध

  • काही रस्त्याने प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे; मात्र शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला परिसरातील नागरिकांची मंजुरी मिळत नसल्याचेही काही गावांत चित्र आहे.
  • रस्त्याचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे. शेतातील रस्ता देण्यास काही शेतकरी अडवणूक करीत असल्याने रस्ता मंजूर होऊनही काम सुरु झाले नसल्याची स्थिती आहे.
  • काही रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी अडली आहे.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रchandrapur-acचंद्रपूर