शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वरोऱ्याचा ओंकार कुनवटकर जिल्ह्यात टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:39 IST

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मधुकर कुनवटकर हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ९४.९२ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे.

ठळक मुद्देजिवती तालुका अव्वल : जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मधुकर कुनवटकर हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी ९४.९२ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रणित गिरडकर हा ९३.०७ टक्के घेऊन द्वितीय आला आहे. तर ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तनया राजेश गेडाम ही ९२.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ६१८ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २३ हजार १४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६८८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.पाच हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४ हजार ९९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ६५८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी घसरली आहे.मुलींनीच मारली बाजीमागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ८५० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८३८ मुले परीक्षेला बसली. यातील ११ हजार ५१२ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७७.५८ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ७८४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ७८० मुलींनी परीक्षा दिली. यातून ११ हजार ६३७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८४.४५ आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी दाखविली चुणूकजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून गोंडपिपरी, कोरपना, मूल, नागभीड, सावली, सिंदेवाही व जिवती या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. त्या तुलनेत बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा या शहरी भागातील मुले निकालात मागे पडली आहे.वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिकआजपर्यंत विज्ञान शाखा निकालात बाजी मारत आली आहे. मात्र यावर्षी प्रथमच बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार १५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून एक हजार ८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून ६०५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेची टक्केवारी ८७.९३ आहे. कला शाखेतून एकूण १३ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ८६९ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी १० हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ७६.३९ आहे. विज्ञान शाखेतून एकूण १० हजार ९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १० हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी नऊ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८५.८२ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ६३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील एक हजार ६३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार २५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ७६.७७ इतकी आहे.पोंभूर्णा तालुका पिछाडीवरयंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात जिवती तालुका (९०.६२) जिल्ह्यात अव्वल राहिला. सावली तालुका (८७.९४ टक्के ) दुसºया तर पोंभूर्णा तालुका ६१.३४ टक्के घेऊन पिछाडीवर गेला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल