शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पडोली ते कांरजा रस्त्यावरील टोेलवसुली सुरू करण्यात येऊ नये

By admin | Updated: September 9, 2016 00:55 IST

पडोली-घुग्घुस-वणी- कारंजा या रस्त्याच्या चौपदीरकरणाचे कार्य मागील काही वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : अधीक्षक अभियंता यांना निवेदनचंद्रपूर : पडोली-घुग्घुस-वणी- कारंजा या रस्त्याच्या चौपदीरकरणाचे कार्य मागील काही वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. मात्र धानोरा ते लहान पांढरकवडा दरम्यान टोलनाका बसविण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू असून चालु असलेले काम बघता लवकरच टोल वसूलीला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. हा टोल नाका सुरू करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे.पडोली-घुग्घुस-वणी-कारंजा या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पाणी टँकी घुग्घुस, नवीन बसस्थानक ते राजीव रतन दवाखान्यापर्यंत रस्त्याचे कार्य मागील दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्यावर जागोजागी गिट्टी व गदड माती विखुरलेली आहेत. तसेच हा मार्ग पुणे-यवतमाळ-अमरावतीसाठी मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. स्थगित असलेले रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करून राजीव रतन ते प्रियदर्शिनी कन्या विद्यालयापर्यंत प्रत्येकी २०० मिटर अंतरावर गतिरोधकांची निर्मिती करणे, घुग्घुस तसेच परिसरातील ग्रामीण क्षेत्रातील युवकांना टोल नाक्यावर रोजगारांची संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय टोल वसुलीला सुरूवात करण्यात येवू नये, अशी मागणी केली आहे. टोल नाका सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना देण्यात आला आहे. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश रामुगुंडे, घुग्घुस श्रीनिवास गोस्कुला, कामगार नेते सय्यद अनवर, युवक शहराध्यक्ष घुग्घुस दिलीप पिटलवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुजीत उपरे यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)