शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आजच्या युवा पिढीने शिवचरित्र वाचावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:51 IST

केवळ शिवजयंती उत्सव साजरे करणे हा आपला उद्देश नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या युवकांने शिवचिरत्र वाचावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

ठळक मुद्देबाबासाहेब पुरंदरे : शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : केवळ शिवजयंती उत्सव साजरे करणे हा आपला उद्देश नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांच्या घराघरात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या युवकांने शिवचिरत्र वाचावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरीद्वारा शेष मंदिराच्या प्रांगणात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.बाबासाहेब पुढे म्हणाले, शिवजयंती उत्सवात आपण सजून धजून सहभागी होत असतो. परंतुु, शिवाजी महाराजांचे कर्तुत्व असामान्य आहे. शिवाजी महाराज अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत. पन्हाळगडची लढाई शिवरायाने केवळ उत्कृष्ट नियोजनाच्या आधारे जिंकली. शिवाजी महाराजांची योजना आखण्याची पद्धत वेगळीच होती. त्यामुळेच लाखो सैन्यांपुढे, अत्यल्प मावळे विजय संपादन करीत होते. शिवाजी महाराजांचा आपल्या सैन्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास होता. ते ज्यांच्यावर काम सोपवित असत. ते काम त्याचे मावळे किंवा सैन्य निष्ठापूर्वक करत होते. मात्र आजच्या परिस्थितीत तुम्ही आम्ही कुणावरही निष्ठा ठेवत नाही. त्याचबरोबर वेळेचे बंधनही पाळत नाही. त्यामुळे आपल्याला खरे शिवाजी महाराज चिंतन, मनन करुन समजून घेणे हाच खरा जयंती उत्सवाचा भाग असला पाहीजे.दरम्यान, त्यांनी शाहिस्तेखान, अफझलखान यांच्यासोबत झालेल्या युद्धाबद्दलही मार्गदर्शन केले. महाराज एक चारित्र्यवान योद्धा होते. महाराज आपल्याला अनेक बाबी सांगून गेले आहेत. त्या बाबी आपण आत्मसात कराव्यात, असा उपदेश तब्बल एक तासाच्या व्याख्यानात त्यांनी दिला आहे.व्याख्यानापूर्वी शहरातून भवानी माता देवस्थानामधून पालखीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजी महाराजांवर आधारीत स्पर्धा परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वच्छ अभियान अंतर्गत नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार अभिजित परकावार यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होता.संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी पोलिसांच्या देखरेखीतसंभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदरे यांच्या व्याख्यानाला विरोध केला होता. परंतु, व्याख्यानापूर्वीच ‘त्या’ पदाधिकाºयांना पोलिसांनी आपल्या नजरकैदमध्ये बंदिस्त करून ठेवले असल्याने व्याख्यान शांत पद्धतीने पार पडले. दरम्यान व्याख्यानाप्रसंगी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्यासह राखीव पोलीस दलाचे जवान कार्यक्रमस्थळी व शहरातील मुख्य चौकात कडक पहारा देत होते. त्यामुळे ब्रह्मपुरीला व्यख्यानादरम्यान बराच वेळ छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.