शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘१० वी नंतर पुढे काय’ यावर आज मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:24 IST

लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध करियर कौन्सिलर व मोटीव्हेशनल स्पिकर अग्रवाल स्टडी सेंटर आणि चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे संचालक जगदिश अग्रवाल, नो युवर टॅलेंट अकादमीचे संचालक डॉ. रश्मी शुक्ला आदी मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमात वर्ग ९ ते १२ वीचे विद्यार्थी व पालक नि:शुल्क सहभागी होवू शकतात. सर्वप्रथम २०० विद्यार्थी पालक व सखी मंच सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल. नुकतीच दहावीची परीक्षा झाली़ पुढे काय शिकावे,या विवंचनेत विद्यार्थी आहेत. दहावीनंतर विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करत आहेत. भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्यातही डॉक्टर व अभियंता होण्यासाठी अभ्यासक्रम निवडणे, शिकवणी कोणती घ्यायची, महाविद्यालयाची निवड कशी करावी? आदी प्रश्न विद्यार्थी व पालकांना अस्वस्थ करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहेत. व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आणि करियर संदर्भातील हे प्रशिक्षण पे्ररणादायी ठरणार आहे. भविष्याची वाटचाल समृद्ध करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण कदापि चुकवू नये, असा हा उपक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे़यावेळी पालक व विद्यार्थ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जगदिश अग्रवाल देणार आहेत. शिबिरामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी उपक्रम प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८०, ७९७२६११२४३, सखी जिल्हा संयोजिका सोनम मडावी ९९७५६६६३५५ यांच्याशी संपर्क साधावा.सर्व प्रश्नांची हमखास उत्तरेशिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तणावात आहेत. करिअर कसे घडवावे, यासाठी विविध प्रश्नांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे या कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.