शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प

By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST

जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधीची तरतूद होते ...

नागरिकांचे लक्ष : सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारीचंद्रपूर : जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधीची तरतूद होते याकडे नागरिकांचे लक्ष लागून असून विरोधक मात्र अखर्चित निधी, निकृष्ट बैलबंडी वाटप अशा विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा परिषद सध्या विविध कारणांनी गाजत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बैलबंडी घोटाळा गाजत असून या घोटाळ्याची चौकशी झाली. मात्र चौकशी समितीचा अहवाल अद्यापही सादर झालेला नाही. त्यामुळे चौकशी अहवाल दडपल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. तर गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ‘क्रेट’चा कंत्राट जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले यांनी रद्द केल्याने याविरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी सभात्याग केला. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर रितसर ई निविदा काढण्यात आली. आलेल्या दरास मान्यता देण्याकरिता स्थायी समितीची सभा झाली होती. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी मनमानी करून ही योजना नामंजूर केल्याचा आरोप उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताची योजना असतानाही ती नामंजूृर केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही उपाध्यक्षा कल्पना बोरकर यांनी केला. जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत क्रेट पुरविण्याच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांचा योजना नामंजूर करण्याचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे २१ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षांच्या या निर्णयाचा एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय कृषी समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभा वादळी होण्याची शक्यता असून इतर मुद्देही सभेत लावून धरण्याची विरोधकांची तयारी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सभा वादळी ठरण्याची शक्यताजिल्हा परिषदेच्या विविध योजनांवरील निधी अद्यापही अखर्चित आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांनी विभागप्रमुखांची सभा घेऊन निधी खर्च करण्याचे आदेश देत, राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा दम दिला होता. त्यामुळे विभागप्रमुखांनी निधी खर्च करण्याची धावपळ सुरू केली. मात्र बराच निधी आजच्या स्थितीतही अखर्चित असल्याने हा मुद्दा सभेत वादळी ठरण्याची शक्यता आहे.