शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प

By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST

जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधीची तरतूद होते ...

नागरिकांचे लक्ष : सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारीचंद्रपूर : जिल्हा परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधीची तरतूद होते याकडे नागरिकांचे लक्ष लागून असून विरोधक मात्र अखर्चित निधी, निकृष्ट बैलबंडी वाटप अशा विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा परिषद सध्या विविध कारणांनी गाजत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बैलबंडी घोटाळा गाजत असून या घोटाळ्याची चौकशी झाली. मात्र चौकशी समितीचा अहवाल अद्यापही सादर झालेला नाही. त्यामुळे चौकशी अहवाल दडपल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. तर गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ‘क्रेट’चा कंत्राट जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले यांनी रद्द केल्याने याविरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी सभात्याग केला. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर रितसर ई निविदा काढण्यात आली. आलेल्या दरास मान्यता देण्याकरिता स्थायी समितीची सभा झाली होती. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी मनमानी करून ही योजना नामंजूर केल्याचा आरोप उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताची योजना असतानाही ती नामंजूृर केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोपही उपाध्यक्षा कल्पना बोरकर यांनी केला. जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत क्रेट पुरविण्याच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांचा योजना नामंजूर करण्याचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे २१ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षांच्या या निर्णयाचा एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय कृषी समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभा वादळी होण्याची शक्यता असून इतर मुद्देही सभेत लावून धरण्याची विरोधकांची तयारी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सभा वादळी ठरण्याची शक्यताजिल्हा परिषदेच्या विविध योजनांवरील निधी अद्यापही अखर्चित आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांनी विभागप्रमुखांची सभा घेऊन निधी खर्च करण्याचे आदेश देत, राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा दम दिला होता. त्यामुळे विभागप्रमुखांनी निधी खर्च करण्याची धावपळ सुरू केली. मात्र बराच निधी आजच्या स्थितीतही अखर्चित असल्याने हा मुद्दा सभेत वादळी ठरण्याची शक्यता आहे.