शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

आज नदी पूजनाने होणार जल सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

जिल्ह्यात विविध कार्यक्रम : २० मार्चला जल दौडचंद्रपूर : पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ मार्च रोजी विविध नद्यांच्या जलाचे पूजन करण्यात येणार असून २० मार्च रोजी जटपुरा गेट ते गांधी चौक जलदौड आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित होणार आहे.१६ मार्चला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन व विविध नद्यांच्या जलाचे पूजन, स्मरणिका प्रकाशन, विभागवार सादरीकरण, चित्ररथास हिरवी झेंडी दाखविणे आदी कार्यक्रम दाताळा मार्गावरील इरई नदी पुलाजवळील बालाजी मंदिरालगत सकाळी ८ वाजता होणार आहे.१७ ते २१ मार्च पाण्याची बचत व महत्व याबाबत चर्चासत्रे, पाणी वापर संस्थेचे महत्त्व, कार्यशाळा व माहिती देणे तसेच चित्ररथाद्वारे जलजागृती, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावात जलदिंडी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाद्वारे जिल्हयात विविध तालुकास्तरावर व व्यापक स्वरूपात जलजागृती करण्यात येणार आहे. २० मार्चला सकाळी जलजागृती जलदौडीचे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. ही दौड जटपूरा गेट ते गांधीचौक व पुन्हा जटपूरा गेट या मार्गाने होईल. या जलदौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२२ मार्चला जलसाक्षरता सांस्कृतिक कार्यक्रम, जलजागृती सप्ताहाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात दुपारी २ वाजतापासून आयोजित करण्यात आले आहे.या सप्ताहात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनुने, कार्यकारी अभियंता खडकी व कार्यकारी अभियंता ए.बी. भाले यांनी केले आहे. (प्रतिनिधी) २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी १६ ते २२ मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जल जागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यात पाण्यासंबंधी कार्यरत असलेल्या कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास या सर्व विभागांमार्फत जलजागृतीबाबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यात एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पाची उभारणी व सिंचन व्यवस्थापन ही महत्त्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्यामुळे जल जागृती सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांशी संपर्क करून समाजात जल साक्षरता-जागृती निर्माण करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागावर आहे. त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हा जल जागृती सप्ताहामध्ये जलसंपदा विभागामार्फत कार्यक्रम आखले आहेत.