शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

आज नदी पूजनाने होणार जल सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

जिल्ह्यात विविध कार्यक्रम : २० मार्चला जल दौडचंद्रपूर : पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ मार्च रोजी विविध नद्यांच्या जलाचे पूजन करण्यात येणार असून २० मार्च रोजी जटपुरा गेट ते गांधी चौक जलदौड आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित होणार आहे.१६ मार्चला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन व विविध नद्यांच्या जलाचे पूजन, स्मरणिका प्रकाशन, विभागवार सादरीकरण, चित्ररथास हिरवी झेंडी दाखविणे आदी कार्यक्रम दाताळा मार्गावरील इरई नदी पुलाजवळील बालाजी मंदिरालगत सकाळी ८ वाजता होणार आहे.१७ ते २१ मार्च पाण्याची बचत व महत्व याबाबत चर्चासत्रे, पाणी वापर संस्थेचे महत्त्व, कार्यशाळा व माहिती देणे तसेच चित्ररथाद्वारे जलजागृती, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावात जलदिंडी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाद्वारे जिल्हयात विविध तालुकास्तरावर व व्यापक स्वरूपात जलजागृती करण्यात येणार आहे. २० मार्चला सकाळी जलजागृती जलदौडीचे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. ही दौड जटपूरा गेट ते गांधीचौक व पुन्हा जटपूरा गेट या मार्गाने होईल. या जलदौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२२ मार्चला जलसाक्षरता सांस्कृतिक कार्यक्रम, जलजागृती सप्ताहाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात दुपारी २ वाजतापासून आयोजित करण्यात आले आहे.या सप्ताहात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनुने, कार्यकारी अभियंता खडकी व कार्यकारी अभियंता ए.बी. भाले यांनी केले आहे. (प्रतिनिधी) २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी १६ ते २२ मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जल जागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यात पाण्यासंबंधी कार्यरत असलेल्या कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास या सर्व विभागांमार्फत जलजागृतीबाबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यात एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पाची उभारणी व सिंचन व्यवस्थापन ही महत्त्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्यामुळे जल जागृती सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांशी संपर्क करून समाजात जल साक्षरता-जागृती निर्माण करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागावर आहे. त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हा जल जागृती सप्ताहामध्ये जलसंपदा विभागामार्फत कार्यक्रम आखले आहेत.