शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

चंद्रपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये चार महिन्यांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:59 IST

चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कशी करावी शेती? शर्मिला वाघिणीने घेतले पाच बळी

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे. या वाघिणीने आतापर्यत पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मासळ परिसरातील सातही गावातील नागरिक शेती कशी करायची या विवंचनेत आहेत. त्यांचा वनविभागप्रति रोषही वाढला आहे.सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपले जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.चिमूर तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आता मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात लागला आहे. त्यात चिमूरपासून १५ किमी अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळील मासळ बु, कोलारा, सातारा, बामनगाव, मदनापूर, देवळी, करबडा या गावातील शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. मात्र अश्यातच जंगली प्राणी हल्ला करतात.यामध्ये शेतकऱ्यांचा नाहक बळी जात आहे. मागील पाच महिन्यात मासळ, कोलारा, सातारा, बामनगाव या गावातील पाच लोकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यामुळे आता या गावातील नागरिकांत भीती पसरली असून आता शेतीचे कामे कशी करायची, ही चिंता आहे. वनविभागाने याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतशेतीचे काम करताना वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील राजेश दडमल यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने तत्काळ पाच लाख रुपयांची मदत दिली. उर्वरित रक्कम मृतकाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाने दिले. यावेळी डिएफओ गुरू प्रसाद, एसीएफ जाधव, डिसीएफ लडकत, एसीफ खोरे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ