शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाघाची दहशत अन्‌ भयभीत ग्रामीण जनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या ...

पंधरवड्यात वाघाने घेतला चारजणांचा बळी

मूल : तालुक्यात बफर व नॉनबफर असे वनविभागाचे कार्यालय असून, या दोन्ही वनविभागाच्या जंगलात वाघाची दहशत असल्याने ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. या पंधरवडयात वाघाने चारजणांचा बळी घेतला आहे.

ग्रामीण भागातील जनता आपल्या उदरनिर्वाहासाठी सरपणासाठी लाकडे असोत किंवा मोहफूल असो जंगलात जात असतात. वनविभाग वेळोवेळी सावधान करीत असतानादेखील ग्रामीण जनता ऐकण्याच्या मन तीत दिसत नसल्याने मानव व प्राणी संघर्ष निरंतर सुरूच राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने नॉनबफर असलेल्या मूल वनपरिक्षेत्राचे विभाजन करून मूल येथे बफरचे वनपरिक्षेञ कार्यालय निर्माण करण्यात आले; तर नॉनबफरमधील भाग चिचपल्ली वनपरिक्षेत्राला जोडण्यात आला. या दोन्ही वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठया प्रमाणात आहे. तालुक्यातील जानाळा, चिरोली, चिचाळा, दहेगाव, मानकापूर, मारोडा, करवन, काटवन, सोमनाथ आदी बफर व नॉनबफर क्षेत्रात दिवसाढवळया वाघांचे दर्शन होऊ लागले आहे. वाघ कधी रस्त्यावर ठाण मांडून बसलेला आढळून येत आहे, तर कधी शेतात त्याचे पायाचे ठसे दिसून येत आहेत. त्यामुुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पंधरवड्यात वाघाने चारजणांना हल्ला करून ठार केले आहे. यात कल्पना वाढई (कांतापेेेठ), कीर्तीराम कुुळमेथे (जानाळा), वसंत गेडाम (जानाळा), मनोहर प्रधाने (मारोडा) यांचा समावेश आहे.

बॉक्स

जंगलात जाणे सुरूच

बफर व नॉनबफर वनविभागाच्या जंगलात शेती असल्याने शेतीसाठी जंगलात जावेच लागते. तसेच रोजगार हमीचे काम असो किंवा मोहफुले, सरपणासाठी लाकडे, गुराची चराई असो, जंगलात जाणे आवश्यक आहे. वाघाच्या भीतीने आपला व्यवसायाकडे पाठ फिरविणे शक्य नसल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे असले वाघाचे हल्ले हे होतच राहिले, तर शासनाचादेखील करोडो रुपयांचा निधी यात खर्च तर होईलच; मात्र घरातील कमावता व्यक्तीला गमवावे लागणार आहे. यासाठी शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून मानव व प्राणी संघर्षाला पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.