शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र परिसरात वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री दुर्गापूर येथील १६ वर्षीय युवकावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. त्यामुळे सीएसटीपीएस परिसरानजीक असलेल्या वसाहतींमध्ये प्रचंड दहशत पसरली. रात्रपाळीत कर्तव्य बजावणारे कामगारही हादरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा जंगल परिसरातील लागूनच असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात वाघ-बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले. २४ तासांत वाघाने दोघांचा बळी घेतला. या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही, तर परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते, असा अंदाज आल्याने नागरिकांत आता प्रचंड असंतोष खदखदू लागला आहे.बुधवारी वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वाघ आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला होता. हा वाघ ताडोबा जंगलातून चंद्रपूर- नागपूर मार्गावरील राष्ट्रवादी नगर परिसरातील वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आला. काहीवेळ त्याच ठिकाणी भटकून तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. या परिसराला लागून मोठी वसाहत आहे. परिसरात आलेला वाघ घनदाट जंगलात न जाता त्याच परिसरात फिरत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री दुर्गापूर येथील १६ वर्षीय युवकावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. त्यामुळे सीएसटीपीएस परिसरानजीक असलेल्या वसाहतींमध्ये प्रचंड दहशत पसरली. रात्रपाळीत कर्तव्य बजावणारे कामगारही हादरले आहेत.

वाघ-बिबटाचा मानवी वस्तीत शिरकाव- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली असून नैसर्गिक अधिवास क्षेत्र कमी पडू लागले. त्यामुळे इरई नदीच्या काठाने वाघ-बिबट व हिंस्त्र वन्यप्राणी चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात शिरकाव करीत आहेत.

तर घराबाहेर निघणे कठीण- चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात घनदाट जंगल तयार झाले आहे. या परिसरात दिवसभर वर्दळ असली तरी रात्रीच्या सुमारास तिथे प्रवेश करणे आता कठीण झाले.   जंगलाला लागून असलेल्या ऊर्जानगर, दुर्गापूर, राष्ट्रवादी नगर परिसरात रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा संचार नित्याचाच होता. मात्र, आता वाघ व बिबट फिरू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. वाघ-बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर घराबाहेर निघणे कठीण होईल, अशी भीती      व्यक्त करीत आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ