शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

माना टेकडी परिसरात वाघ-बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

ठळक मुद्देशेतकऱ्याला भरपाई द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला लगतच्या माना टेकडी परिसरात काही दिवसांपासून वाघबिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.गुरूवारी बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील झुडपे कापावे आणि पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघाने बैलावर हल्ला केल्याची माहिती मिळताच बुधवारी आमदार किशोर जोरगेवार, वेकोलि व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.गुरूवारी शेतकरी पोळे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर बैल जखमी झाला. शेतकºयांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, वनक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार, वेकोलिचे क्षेत्रीय व्यवस्थापक हलदर आदींनी माना टेकडी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात नागरिकांनी शेतीची कामे करताना खबरदारी घ्यावे, असे आवाहन केले. संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील झूडपी झाडे तोडून पथदिवे लावण्याचे काम केले जाणार आहे.शेतकऱ्याला भरपाई द्यावीवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे माना टेकडीवर झुडपी जंगल वाढले. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गतवर्षीही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या