शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:15 IST

उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

ठळक मुद्देमृत वाघाच्या पंचनाम्यावर स्वाक्षरीपुरतेच महत्त्व असल्याची खंत

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक या घटनेबाबत उघड बोलायला तयार नाही. वन्यजिवांबाबत तत्परता दाखविणारी ही मंडळी इतकी शांत का, असा सवाल उपस्थित होत आहे.सुमारे दहा वर्षांपूर्वी अदानी प्रकल्पामुळे आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या प्रस्तावित प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजिवांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन पर्यावरणवाद्यांनी तीव्र आंदोलन उभारले होते. मुद्दा चंद्रपूर जिल्ह्याच्या हिताचा होता. यामुळे चंद्रपूरकरांचीही चांगलीच साथ लाभली. इको-प्रोचे बंडू धोत्रे यांनी तर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. आणि अदानीला येथून परत जावे लागले होते. उपचाराविना मरण पावलेला वाघही ताडोबातीलच होता. लगतच्या वनपरिक्षेत्रात जखमांनी विव्हळत त्याचा मृत्यू झाला. चार दिवसांपासून त्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकत असतानाही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक वाघाच्या मदतीला धावून गेला नाही. मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे हे शवविच्छेदन करताना उपस्थित होते. एका स्थानिक वन्यजीव प्रतिनिधी व्यतिरिक्त विवेक करंबेकर व अमोल बैस हे दोन्ही मानद वन्यजीव रक्षक कुठेही दिसले नाही.या घटनेनतंरही ही मंडळी आपली भूमिका पुढे येऊन स्पष्ट करताना दिसली नाही. यामुळे वन्यजीवांचा वाली कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर तर एका वन्यजीवप्रेमीने ‘झाले ते झाले यानंतर तत्परता दाखवावी म्हणजे झाले’, अशी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून वाघावर वेळीच उपचार का झाले नाही हे ठासून विचारण्याऐवजी अधिकारी दुखावू नये याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते.

आम्ही मानद वन्यजीव रक्षक नावालाच ठरलो आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ वाघ मरण पावला तर पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याकरिता बोलावतात. कधी कुठल्या बैठकांनाही बोलावत नाही. वाघ जखमी होता. मात्र उपचाराबाबत काय भूमिका घेतली पाहिजे हे विचारणे तर सोडाच या घटनेचीही माहिती दिलेली नाही. अधिकारी वनमंत्र्यांचीही दिशाभूल करीत आहेत. आम्हीच अशा घटना वनमंत्र्यांपर्यंत पोहचवितो. फक्त विश्वासातल्या लोकांनाच हे अधिकारी सांगत असतात.- अमोल बैस, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

वनविभागाने ही घटना कळविलीच नाही. स्वयंसेवी संस्थांमार्फत ही माहिती मिळाली. वनविभाग असा का करतो हे मात्र सांगू शकत नाही. वाघावर उपचार करण्यात दिरंगाई झाली हे जगजाहीर आहे. वनमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे. त्या अहवालात अधिकारी काय लिहून देतात हे कळेलच. त्यानंतरच आपली भूमिका घेणार आहे. हे प्रकरण ‘लोकमत’मुळेच उजागर झाले.- विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी.

गंभीर स्वरपाच्या जखमी वाघावर उपचार करण्यासाठी एसओपीच्या नियमावलीत शिथिलता असावी. तसे झाल्यास अशा घटना टाळता येतील, असे पत्र एनटीसीएला पाठविले आहे.- बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ