शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:15 IST

उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

ठळक मुद्देमृत वाघाच्या पंचनाम्यावर स्वाक्षरीपुरतेच महत्त्व असल्याची खंत

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक या घटनेबाबत उघड बोलायला तयार नाही. वन्यजिवांबाबत तत्परता दाखविणारी ही मंडळी इतकी शांत का, असा सवाल उपस्थित होत आहे.सुमारे दहा वर्षांपूर्वी अदानी प्रकल्पामुळे आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या प्रस्तावित प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजिवांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन पर्यावरणवाद्यांनी तीव्र आंदोलन उभारले होते. मुद्दा चंद्रपूर जिल्ह्याच्या हिताचा होता. यामुळे चंद्रपूरकरांचीही चांगलीच साथ लाभली. इको-प्रोचे बंडू धोत्रे यांनी तर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. आणि अदानीला येथून परत जावे लागले होते. उपचाराविना मरण पावलेला वाघही ताडोबातीलच होता. लगतच्या वनपरिक्षेत्रात जखमांनी विव्हळत त्याचा मृत्यू झाला. चार दिवसांपासून त्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकत असतानाही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक वाघाच्या मदतीला धावून गेला नाही. मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे हे शवविच्छेदन करताना उपस्थित होते. एका स्थानिक वन्यजीव प्रतिनिधी व्यतिरिक्त विवेक करंबेकर व अमोल बैस हे दोन्ही मानद वन्यजीव रक्षक कुठेही दिसले नाही.या घटनेनतंरही ही मंडळी आपली भूमिका पुढे येऊन स्पष्ट करताना दिसली नाही. यामुळे वन्यजीवांचा वाली कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर तर एका वन्यजीवप्रेमीने ‘झाले ते झाले यानंतर तत्परता दाखवावी म्हणजे झाले’, अशी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून वाघावर वेळीच उपचार का झाले नाही हे ठासून विचारण्याऐवजी अधिकारी दुखावू नये याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते.

आम्ही मानद वन्यजीव रक्षक नावालाच ठरलो आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ वाघ मरण पावला तर पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याकरिता बोलावतात. कधी कुठल्या बैठकांनाही बोलावत नाही. वाघ जखमी होता. मात्र उपचाराबाबत काय भूमिका घेतली पाहिजे हे विचारणे तर सोडाच या घटनेचीही माहिती दिलेली नाही. अधिकारी वनमंत्र्यांचीही दिशाभूल करीत आहेत. आम्हीच अशा घटना वनमंत्र्यांपर्यंत पोहचवितो. फक्त विश्वासातल्या लोकांनाच हे अधिकारी सांगत असतात.- अमोल बैस, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

वनविभागाने ही घटना कळविलीच नाही. स्वयंसेवी संस्थांमार्फत ही माहिती मिळाली. वनविभाग असा का करतो हे मात्र सांगू शकत नाही. वाघावर उपचार करण्यात दिरंगाई झाली हे जगजाहीर आहे. वनमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे. त्या अहवालात अधिकारी काय लिहून देतात हे कळेलच. त्यानंतरच आपली भूमिका घेणार आहे. हे प्रकरण ‘लोकमत’मुळेच उजागर झाले.- विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी.

गंभीर स्वरपाच्या जखमी वाघावर उपचार करण्यासाठी एसओपीच्या नियमावलीत शिथिलता असावी. तसे झाल्यास अशा घटना टाळता येतील, असे पत्र एनटीसीएला पाठविले आहे.- बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ