शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 16:37 IST

सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.

ठळक मुद्दे ‘त्या’ सोलर कुंपणानेच सीतारामपेठ परिसरात हल्ले वाढले

चंद्रपूर : एकीकडे वनविभागवाघ-मानव संघर्ष कसा कमी होईल हे सांगण्यात मश्गूल असतो आणि दुसरीकडे हाच विभाग या संघर्षाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-मुधोली मार्गावर सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. या सोलर कुंपणामुळे वाघाचा नैसर्गिक मार्ग बंद झाला. हा इरई धरणाकडे जाण्याचा वाघाचा मार्ग होता. सोलर कुंपण टाकल्यापासून वाघाला इरई धरणाकडे जायचे असल्यास तो सीतारामपेठ व कोंडेगाव शिवारात येत आहे. त्याला आता वळण घेऊन धरणावर जावे लागत आहे.

या शिवारात गुराखी जनावरे चराईसाठी आणतात. यापूर्वी अनेकदा वाघांचे हल्ले झाले आहेत. जनावरांना ठार करणे हे नित्याचेच झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी अनेकांनी दुधाळ जनावरे विकली आहेत. ३ फेब्रुवारी सीतारामपेठ येथे नमू संभाजी धांडे या गुराख्याचा बळी गेला याचे कारणही ही सोलर कुंपणच आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून दिली. यावेळी अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधले.

वाघाचे हल्ले आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने वाघाच्या मार्गात टाकलेले सोलर कुंपण हटवावे, अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपचसंचालक, पालकमंत्री, खासदार, आमदारांना दिले आहे. निवेदनावर सरपंच सुषमा जीवतोडे, उपसरपंच शामल नन्नावरे, सदस्य सुषमा ढोक, नीता गेडाम, सलाम शेख, गोविंदा ढोक, देवानंद नैताम यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग