शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 16:37 IST

सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.

ठळक मुद्दे ‘त्या’ सोलर कुंपणानेच सीतारामपेठ परिसरात हल्ले वाढले

चंद्रपूर : एकीकडे वनविभागवाघ-मानव संघर्ष कसा कमी होईल हे सांगण्यात मश्गूल असतो आणि दुसरीकडे हाच विभाग या संघर्षाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-मुधोली मार्गावर सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. या सोलर कुंपणामुळे वाघाचा नैसर्गिक मार्ग बंद झाला. हा इरई धरणाकडे जाण्याचा वाघाचा मार्ग होता. सोलर कुंपण टाकल्यापासून वाघाला इरई धरणाकडे जायचे असल्यास तो सीतारामपेठ व कोंडेगाव शिवारात येत आहे. त्याला आता वळण घेऊन धरणावर जावे लागत आहे.

या शिवारात गुराखी जनावरे चराईसाठी आणतात. यापूर्वी अनेकदा वाघांचे हल्ले झाले आहेत. जनावरांना ठार करणे हे नित्याचेच झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी अनेकांनी दुधाळ जनावरे विकली आहेत. ३ फेब्रुवारी सीतारामपेठ येथे नमू संभाजी धांडे या गुराख्याचा बळी गेला याचे कारणही ही सोलर कुंपणच आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून दिली. यावेळी अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधले.

वाघाचे हल्ले आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने वाघाच्या मार्गात टाकलेले सोलर कुंपण हटवावे, अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपचसंचालक, पालकमंत्री, खासदार, आमदारांना दिले आहे. निवेदनावर सरपंच सुषमा जीवतोडे, उपसरपंच शामल नन्नावरे, सदस्य सुषमा ढोक, नीता गेडाम, सलाम शेख, गोविंदा ढोक, देवानंद नैताम यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग