शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

इको-पार्कच्या माध्यमातून विकासात भर पडणार

By admin | Updated: August 20, 2016 00:45 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील वने ही मोठी संपत्ती आहे. ताडोबा आमची शक्ती आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : मूल शहरात इको-पार्कचे भूमीपूजन मूल : चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील वने ही मोठी संपत्ती आहे. ताडोबा आमची शक्ती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबा आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभयारण्य होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. मूल शहरात उभारण्यात येत असलेल्या इको-पार्कच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूल शहरात खनिज विकास निधीच्या माध्यमातून मंजूर महत्त्वाकांक्षी इको-पार्कचे भूमीपूजन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विविध विकासयोजना राबवून येणाऱ्या काळात मूल शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे तसेच जि.प. सभापती देवराव भोंगळे, नंदू रणदिवे, वर्षा परचाके आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.इको-पार्कमुळे मूलच्या विकासात अधिकच भर पडणार आहे. चंद्रपूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने भूमीपूजन करण्यात आलेल्या भव्य उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी केले. त्याच पध्द्तीने पुढच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी याही पार्कचे उद्घाटन होईल, याची मला खात्री आहे असे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. प्रारंभी इको-पार्कचे कोनशिला पूजन झाले. त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुवर्णा गुहे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)उद्यानाच्या रूपात रोजगार मिळणारडॉ. श्यामाप्रसाद मुनगंटीवार जन-वन विकास योजना या भागात रोजागार वाढावा यासाठी अंमलात आणली आहे. विभिन्न ५५ हजार वृक्ष प्रकारांचा जीवंत इतिहास येथे उद्यानाच्या रूपात विकसीत करताना योगगुरू रामदेव बाबा यांच्या सहकार्याने येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आखणी आपण केली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. तलावाचे होणारसौंदर्यीकरणउथळपेठ (गायमुख) आणि अजयपूर यांचाही विकास निसर्ग पर्यटन योजनेत करण्यात येणार आहे. मूल ही माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या स्मरणार्थ ८ कोटी रूपये खर्च करून भव्य वास्तु उभारली आहे. याचे उद्घाटन तीन महिन्यात व्हावे असे नियोजन आम्ही केले आहे. सोबतच १ कोटी रूपये खर्च करून सुसज्ज वाचनालय येथे बांधण्यात येत आहे. मूल शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करताना सिंचन क्षेत्र आधी वाढवू, त्यानंतर नयनरम्य असे पर्यटन स्थळ येथे उभारू, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.