शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

इको-पार्कच्या माध्यमातून विकासात भर पडणार

By admin | Updated: August 20, 2016 00:45 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील वने ही मोठी संपत्ती आहे. ताडोबा आमची शक्ती आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : मूल शहरात इको-पार्कचे भूमीपूजन मूल : चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील वने ही मोठी संपत्ती आहे. ताडोबा आमची शक्ती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबा आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभयारण्य होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. मूल शहरात उभारण्यात येत असलेल्या इको-पार्कच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूल शहरात खनिज विकास निधीच्या माध्यमातून मंजूर महत्त्वाकांक्षी इको-पार्कचे भूमीपूजन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विविध विकासयोजना राबवून येणाऱ्या काळात मूल शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे तसेच जि.प. सभापती देवराव भोंगळे, नंदू रणदिवे, वर्षा परचाके आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.इको-पार्कमुळे मूलच्या विकासात अधिकच भर पडणार आहे. चंद्रपूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने भूमीपूजन करण्यात आलेल्या भव्य उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी केले. त्याच पध्द्तीने पुढच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी याही पार्कचे उद्घाटन होईल, याची मला खात्री आहे असे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. प्रारंभी इको-पार्कचे कोनशिला पूजन झाले. त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुवर्णा गुहे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)उद्यानाच्या रूपात रोजगार मिळणारडॉ. श्यामाप्रसाद मुनगंटीवार जन-वन विकास योजना या भागात रोजागार वाढावा यासाठी अंमलात आणली आहे. विभिन्न ५५ हजार वृक्ष प्रकारांचा जीवंत इतिहास येथे उद्यानाच्या रूपात विकसीत करताना योगगुरू रामदेव बाबा यांच्या सहकार्याने येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आखणी आपण केली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. तलावाचे होणारसौंदर्यीकरणउथळपेठ (गायमुख) आणि अजयपूर यांचाही विकास निसर्ग पर्यटन योजनेत करण्यात येणार आहे. मूल ही माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या स्मरणार्थ ८ कोटी रूपये खर्च करून भव्य वास्तु उभारली आहे. याचे उद्घाटन तीन महिन्यात व्हावे असे नियोजन आम्ही केले आहे. सोबतच १ कोटी रूपये खर्च करून सुसज्ज वाचनालय येथे बांधण्यात येत आहे. मूल शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करताना सिंचन क्षेत्र आधी वाढवू, त्यानंतर नयनरम्य असे पर्यटन स्थळ येथे उभारू, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.