शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गडीसुर्ला नळ योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:12 IST

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ ...

ठळक मुद्देहजारो लिटर पाणी व्यर्थ : जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात़ पाईन लाईनलस गळती असल्याने पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते. शासनाने पाणी बचतीसाठी जनजागृती करीत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात नळांना मीटर बसवून पाणी जपून वापरण्याचे संकेत दिले आहेत़ तर दुसरीकडे नळयोजनेची दुरूस्ती करण्यासाठी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे चित्र या परिसरात दिसून येत आहे़ यंदा अल्प पाऊस पडल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खालावली़ काही ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याने महिला हैराण झाल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना योग्यरित्या सुरू ठेवल्यास १९ गावांतील नागरिकांची अडचण कायमची दूर होवू शकते़ मात्र, पाईप लाईनला शेकडो ठिकाणी गळती असल्याने यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती झाली नाही, तर काही दिवसांत पाण्यासाठी हाहाकार निर्माण होवू शकतो़यासंदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे़ पण, अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळावर येवून पाहणी केली नाही़ पाईपलाईन गळती असलेल्या शेतात दिवस-रात्र पाणी वाया जात आहे़ नागरिकांकडून पाण्याचे देयक वेळेवर भरले जाते़ शासनाच्या सर्वच योजनांना सहकार्य करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली़ पण, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे १९ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे़जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांपासून पाईपलाईनला गळती आहे़ यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय, काही गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होतो़ त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी ही समस्या तातडीने सोडवावी़- प्रकाश गांगरेड्डीवार, माजी सभापती पं.स. मूल