शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

गडीसुर्ला नळ योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:12 IST

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ ...

ठळक मुद्देहजारो लिटर पाणी व्यर्थ : जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतभेजगाव: बोरचांदली व परिसरातील १९ गावांकरिता लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचे मुख्य केंद्र गडिसुर्ला येथे आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली़ परिणामी, नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही़पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन शेतातून टाकण्यात आली़ शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात़ पाईन लाईनलस गळती असल्याने पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते. शासनाने पाणी बचतीसाठी जनजागृती करीत आहे़ शहरांसह ग्रामीण भागात नळांना मीटर बसवून पाणी जपून वापरण्याचे संकेत दिले आहेत़ तर दुसरीकडे नळयोजनेची दुरूस्ती करण्यासाठी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे चित्र या परिसरात दिसून येत आहे़ यंदा अल्प पाऊस पडल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खालावली़ काही ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याने महिला हैराण झाल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना योग्यरित्या सुरू ठेवल्यास १९ गावांतील नागरिकांची अडचण कायमची दूर होवू शकते़ मात्र, पाईप लाईनला शेकडो ठिकाणी गळती असल्याने यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती झाली नाही, तर काही दिवसांत पाण्यासाठी हाहाकार निर्माण होवू शकतो़यासंदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे़ पण, अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळावर येवून पाहणी केली नाही़ पाईपलाईन गळती असलेल्या शेतात दिवस-रात्र पाणी वाया जात आहे़ नागरिकांकडून पाण्याचे देयक वेळेवर भरले जाते़ शासनाच्या सर्वच योजनांना सहकार्य करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली़ पण, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे १९ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे़जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांपासून पाईपलाईनला गळती आहे़ यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय, काही गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होतो़ त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी ही समस्या तातडीने सोडवावी़- प्रकाश गांगरेड्डीवार, माजी सभापती पं.स. मूल