शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

थरारक! बसस्थानकावरच दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 23:41 IST

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही.  काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सास्ती येथील रहिवासी करण व आकाश कंडे हे सख्खे भावंडे स्वगावी परतत असताना एका टोळीने राजुरा बसस्थानक परिसरात धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेने शहर चांगलेच हादरले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून शहरात गुंडगिरी वाढल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.    करण व आकाश कंडे हे दोघे भाऊ राजुरामार्गे सास्तीला जात होते. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. एका भावाच्या पोटात चाकूने हल्ला केल्याने आतडी बाहेर निघाल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य एका भावाच्या डोक्यावर मारण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला व बचावासाठी आरडाओरडा करू लागले. पण रात्रीची वेळ असल्याने बसस्थानक परिसर हा निर्मनुष्य होता. त्यामुळे मदतीला कुणीही आले नाही. काही वेळानंतर काहींनी जखमी अवस्थेत असलेल्या या भावंडांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी