शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम वन योजनेत चिमूर तालुक्यातील तीन गावे

By admin | Updated: July 7, 2014 23:28 IST

वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील,

खडसंगी : वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, त्यामुळे ग्रामस्थांची वना विषयी आस्था वाढून वनाचे संरक्षण व संवर्धन होईल याच उदात्त हेतूने ही योजना अंमलात आली आहे. वनपरिक्षेत्र चिमूरअंतर्गत या योजनेसाठी शेडेगाव, पिटीचुआ, डोंगर्ला या गावाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेद्वारे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गावाभोवती असलेले सर्व वनक्षेत्र गावाच्या हवाली केल्या जाणार आहे. वरील गावे आधीच संयुक्त वनव्यवस्थापन (जार्इंट फॉरेस्ट मॅनेजमेंट) योजनेत समाविष्ठ आहेत. या वनातून मिळणारे सर्व उत्पन्न त्या गावाला मिळणार आहे, तर वनव्यवस्थापनासाठी दरवर्षी प्रती हेक्टर १००० रुपये समितीला शासनातर्फे देण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावातील ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या सदस्याना जवळच्या वन प्रशिक्षण संस्थेतून पाच दिवसांचे वन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. वनातील कामाच्या म्हणजेच फळझाडाचे मोहासारखे बहुपयोगी झाडे तसेच वन्यजीवांच्या उपयोगांच्या झाडाचे संवर्धन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.हे निकष पूर्ण करणाऱ्या संवर्धीत गावांना ग्रामसभेत ठरावासोबत आवश्यक ती छायाचित्रे व अहवालासह उपवन संरक्षकाकडे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तो अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविल्यानंतर त्या गावांची निवड करण्यात येणार आहे.ग्रामवन योजनेत समाविष्ठ असलेल्या गावातलाभार्थी निधीचा गैरवापर झाला किंवा ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय २० हजारापेक्षा अधीक खर्च सुक्ष्म आराखड्या व्यतिरिक्त केल्यास तथा वृक्षतोड व वन वणव्यास प्रतिबंध करण्यात ग्रामवन समिती अपयशी ठरल्यास वनविभाग त्या गावातील वनक्षेत्र आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यामुळे सर्व निकष पाळणे बंधनकारक ठरणार आहे. (वार्ताहर)