शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

ग्राम वन योजनेत चिमूर तालुक्यातील तीन गावे

By admin | Updated: July 7, 2014 23:28 IST

वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील,

खडसंगी : वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, त्यामुळे ग्रामस्थांची वना विषयी आस्था वाढून वनाचे संरक्षण व संवर्धन होईल याच उदात्त हेतूने ही योजना अंमलात आली आहे. वनपरिक्षेत्र चिमूरअंतर्गत या योजनेसाठी शेडेगाव, पिटीचुआ, डोंगर्ला या गावाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेद्वारे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गावाभोवती असलेले सर्व वनक्षेत्र गावाच्या हवाली केल्या जाणार आहे. वरील गावे आधीच संयुक्त वनव्यवस्थापन (जार्इंट फॉरेस्ट मॅनेजमेंट) योजनेत समाविष्ठ आहेत. या वनातून मिळणारे सर्व उत्पन्न त्या गावाला मिळणार आहे, तर वनव्यवस्थापनासाठी दरवर्षी प्रती हेक्टर १००० रुपये समितीला शासनातर्फे देण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावातील ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या सदस्याना जवळच्या वन प्रशिक्षण संस्थेतून पाच दिवसांचे वन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. वनातील कामाच्या म्हणजेच फळझाडाचे मोहासारखे बहुपयोगी झाडे तसेच वन्यजीवांच्या उपयोगांच्या झाडाचे संवर्धन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.हे निकष पूर्ण करणाऱ्या संवर्धीत गावांना ग्रामसभेत ठरावासोबत आवश्यक ती छायाचित्रे व अहवालासह उपवन संरक्षकाकडे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तो अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविल्यानंतर त्या गावांची निवड करण्यात येणार आहे.ग्रामवन योजनेत समाविष्ठ असलेल्या गावातलाभार्थी निधीचा गैरवापर झाला किंवा ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय २० हजारापेक्षा अधीक खर्च सुक्ष्म आराखड्या व्यतिरिक्त केल्यास तथा वृक्षतोड व वन वणव्यास प्रतिबंध करण्यात ग्रामवन समिती अपयशी ठरल्यास वनविभाग त्या गावातील वनक्षेत्र आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यामुळे सर्व निकष पाळणे बंधनकारक ठरणार आहे. (वार्ताहर)