शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पोहणे जिवावर बेतले; तीन शाळकरी विद्यार्थ्यांना जलसमाधी

By राजेश भोजेकर | Updated: January 27, 2023 11:20 IST

अल्ट्राटेक कंपनीच्या तलावात गणराज्यदिनी दुर्घटना

आवाळपूर (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या कृत्रिम तलावातील डबक्यात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, शुक्रवारी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.

पारस सचिन गोवारदिपे (१०), दर्शन शंकर बशाशंकर (१०) व अर्जुन सुनील सिंग (१०) तिघेही रा.अल्ट्राटेक कंपनी वसाहत अशी मृतकांची नावे आहेत. हे तिघेही आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये चवथ्या वर्गात शिकत होते. गुरुवारी गणराज्य दिनाच्या दिवशी पारस, दर्शन व अर्जुन ही मुले कृत्रिम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोहण्यासाठी गेली. मात्र, अंधार पडल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली असता, तलावाच्या काठावर तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला पाचारण करून पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. मात्र, पाणी अथांग असल्यामुळे शिवाय रात्रीचा वेळ असल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

शुक्रवारला पोलिस प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. त्यांच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांमध्ये तळाशी असलेल्या गाळात फसून असलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजीत आमले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, जमादार संदीप अडकिने व त्यांचे सहकारी करीत आहे.

सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे

अल्ट्राटेक कंपनीने खोदलेल्या तलावात तीन कोवळ्या मुलांचा जीव गेल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून खोदलेल्या या तलावातून माती उपसण्यात आल्याने डोह तयार झाला. शिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्यामुळे वा सुरक्षाविषयक कोणताही सांकेतिक चिन्ह वा खुणा या ठिकाणी लावल्या नसल्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले येथे खेळण्यासाठी जातात.

अल्ट्राटेक परिसरामध्ये घडलेल्या घटनेस कंपनी प्रशासन हेच जबाबदार असून, त्यांनी खणलेल्या मानवनिर्मित तलावाची अनेकांना माहितीही नाही, शिवाय तलावाच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचा सुरक्षा कर्मचारी किंवा सुरक्षाविषयक सांकेतिक धोक्याची घंटा असल्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळेच ही घटना घडली. कंपनी प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

- साईनाथ बुचे, महासचिव, एल अँड टी कामगार संघटना.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेchandrapur-acचंद्रपूर