शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पोहणे जिवावर बेतले; तीन शाळकरी विद्यार्थ्यांना जलसमाधी

By राजेश भोजेकर | Updated: January 27, 2023 11:20 IST

अल्ट्राटेक कंपनीच्या तलावात गणराज्यदिनी दुर्घटना

आवाळपूर (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या कृत्रिम तलावातील डबक्यात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, शुक्रवारी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.

पारस सचिन गोवारदिपे (१०), दर्शन शंकर बशाशंकर (१०) व अर्जुन सुनील सिंग (१०) तिघेही रा.अल्ट्राटेक कंपनी वसाहत अशी मृतकांची नावे आहेत. हे तिघेही आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये चवथ्या वर्गात शिकत होते. गुरुवारी गणराज्य दिनाच्या दिवशी पारस, दर्शन व अर्जुन ही मुले कृत्रिम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोहण्यासाठी गेली. मात्र, अंधार पडल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली असता, तलावाच्या काठावर तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला पाचारण करून पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. मात्र, पाणी अथांग असल्यामुळे शिवाय रात्रीचा वेळ असल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

शुक्रवारला पोलिस प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. त्यांच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांमध्ये तळाशी असलेल्या गाळात फसून असलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजीत आमले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, जमादार संदीप अडकिने व त्यांचे सहकारी करीत आहे.

सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे

अल्ट्राटेक कंपनीने खोदलेल्या तलावात तीन कोवळ्या मुलांचा जीव गेल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून खोदलेल्या या तलावातून माती उपसण्यात आल्याने डोह तयार झाला. शिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्यामुळे वा सुरक्षाविषयक कोणताही सांकेतिक चिन्ह वा खुणा या ठिकाणी लावल्या नसल्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले येथे खेळण्यासाठी जातात.

अल्ट्राटेक परिसरामध्ये घडलेल्या घटनेस कंपनी प्रशासन हेच जबाबदार असून, त्यांनी खणलेल्या मानवनिर्मित तलावाची अनेकांना माहितीही नाही, शिवाय तलावाच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचा सुरक्षा कर्मचारी किंवा सुरक्षाविषयक सांकेतिक धोक्याची घंटा असल्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळेच ही घटना घडली. कंपनी प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

- साईनाथ बुचे, महासचिव, एल अँड टी कामगार संघटना.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेchandrapur-acचंद्रपूर