शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

By admin | Updated: June 11, 2014 23:53 IST

राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार आपल्या मर्जीनेच काम करीत असल्याने कामात गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. पावसाळा लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या खड्यात पाणी साचणार आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गावाचा विकास हा त्या गावातील रस्त्यावर अवलंबून असतो. स्वच्छ व सुंदर रस्त्यावरुनच गावाची चांगली-वाईट ओळख ठरते. मात्र विरुर गावाच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. बसस्थानकाजवळ सौंदर्यीकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या खड््यात पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. गावात हिवताप, मलेरिया, साथीच्या रुग्णांत वाढ होत आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम केल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.आमदार निधीतून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण करण्याकरिता निधी प्राप्त झाला. सदर काम राजुरा येथील एका कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. रस्त्याच्या एकिकडे कंत्राटदाराने मनमर्जीने रुंदीकरणाचे काम न्सिुरु केले आहे. सदर काम इस्टीमेट नुसार होत नसल्याचे नागरिकात बोलले जात आहे.रस्त्याच्या दुसरीकडील बाजूचे खोदकाम करताना जेसीपीने मुख्य पाण्याची पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खोदकाम करुन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी रस्त्याचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. काम रखडण्याचे कारण अजूनही गावकऱ्यांना समजले नाही. सर्वाधिक वर्दळ असलेल्या बस स्थानक चौकाची अवस्था गंभीर असल्याने नागरिकांना पायी चालनेही कठीण झाले आहे. बसस्थानकाजवळळ सौंदर्यकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेले बांधकाम त्वरित करावे व काम कशामुळे रखडले याची वरिष्ठ रस्त्यावरुन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)