शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

By admin | Updated: June 11, 2014 23:53 IST

राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार आपल्या मर्जीनेच काम करीत असल्याने कामात गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. पावसाळा लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या खड्यात पाणी साचणार आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गावाचा विकास हा त्या गावातील रस्त्यावर अवलंबून असतो. स्वच्छ व सुंदर रस्त्यावरुनच गावाची चांगली-वाईट ओळख ठरते. मात्र विरुर गावाच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. बसस्थानकाजवळ सौंदर्यीकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या खड््यात पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. गावात हिवताप, मलेरिया, साथीच्या रुग्णांत वाढ होत आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम केल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.आमदार निधीतून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण करण्याकरिता निधी प्राप्त झाला. सदर काम राजुरा येथील एका कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. रस्त्याच्या एकिकडे कंत्राटदाराने मनमर्जीने रुंदीकरणाचे काम न्सिुरु केले आहे. सदर काम इस्टीमेट नुसार होत नसल्याचे नागरिकात बोलले जात आहे.रस्त्याच्या दुसरीकडील बाजूचे खोदकाम करताना जेसीपीने मुख्य पाण्याची पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खोदकाम करुन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी रस्त्याचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. काम रखडण्याचे कारण अजूनही गावकऱ्यांना समजले नाही. सर्वाधिक वर्दळ असलेल्या बस स्थानक चौकाची अवस्था गंभीर असल्याने नागरिकांना पायी चालनेही कठीण झाले आहे. बसस्थानकाजवळळ सौंदर्यकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेले बांधकाम त्वरित करावे व काम कशामुळे रखडले याची वरिष्ठ रस्त्यावरुन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)