शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

बालविवाहापासून वाचल्या जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

चंद्रपूर : बालविवाह टाळण्यासाठी बाल संरक्षक समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, सरकारकडून या समित्यांना प्रशिक्षण देऊन अपडेट करण्याचा कार्यक्रम ...

चंद्रपूर : बालविवाह टाळण्यासाठी बाल संरक्षक समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, सरकारकडून या समित्यांना प्रशिक्षण देऊन अपडेट करण्याचा कार्यक्रम सुरू केला नाही, तर जिल्ह्यातही बालविवाहांबाबतची स्थिती मान खाली घालणारी ठरू शकते.

लहान वयात लग्न झाल्यास आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा व गरोदरपणात घ्यायची काळजी हे तर दूरचे विषय असतात. त्यामुळे बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षांत गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात हे असे घडणे विचार शक्तीला काळिमा आहे. आदिवासी व ग्रामीण भागात अशा घटना घडण्याची शक्यता असते. मात्र, चंद्रपूर शहरातील इंदिरानगरात डिसेंबर २०२० मध्ये बालविवाह झाला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टारगेट ग्रुपला ही माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचविले.

आरोपी मुलाविरुद्ध नुकताच २० डिसेंबर २०२० रोजी रामनगर ठाण्यात गुन्हा केला. २०१९-२० मध्ये तीन अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचविले.

कुटुंबांकडून करारपत्र लिहून घेतले

भद्रावती येथेही दोन कुटुंबाकडून बालविवाह लावून देणार नाही, असे करारपत्र लिहून घेतले. कोरपना तालुक्यातील सुब्बई येथील अशा घटनेत आंध्र प्रदेशातील एकाविरुद्ध कारवाई झाली. लहान वयात लादलेला गरोदरपणा व प्रसूतीमुळे अपंगत्व येऊ शकते. गर्भपात, कमी वजनाचे अर्भक, अकाली प्रसूती, अर्भक मृत्यू व उपजत मृत्यूची शक्यता व माता मृत्यूचे प्रमाण वाढते, हे प्रशिक्षित कार्यकर्तेच समुपदेशनातून समाजावून सांगू शकतात.

अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता व परंपरांनी घात

अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता व परंपरा, आदी कारणांनी बालविवाह घडून येतात.

विवाहासाठी मुलीचे वय १८ व मुलाचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.

बाल विवाहात मुलीचे रूप, बुद्धिमत्ता, पात्रता, वय आदींबाबत प्रतिगामी विचार जोपासणाऱ्यांना काही घेणे-देणे नसते. त्यामुळे प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जिल्हाभरात जाळे तयार करणे हाच पर्याय आहे.

कोट

जिल्ह्यात ग्रामीण १५९३ व नगर परिषद क्षेत्रात १०९७ पैकी ३० बालसंरक्षण समित्या गठित झाल्या. उर्वरित समित्या गठित करण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊन काळातही जागृती सुरू होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा महिला व बालक विकास अधिकारी रमेश टेटे, आरोग्य, शिक्षण विभाग यांचेही सहकार्य मिळत आहे.

-अजय साखरकर, जिल्हा संरक्षण अधिकारी, चंद्रपूर.