शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहापासून वाचल्या जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

चंद्रपूर : बालविवाह टाळण्यासाठी बाल संरक्षक समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, सरकारकडून या समित्यांना प्रशिक्षण देऊन अपडेट करण्याचा कार्यक्रम ...

चंद्रपूर : बालविवाह टाळण्यासाठी बाल संरक्षक समित्या गठित करण्यात आल्या. मात्र, सरकारकडून या समित्यांना प्रशिक्षण देऊन अपडेट करण्याचा कार्यक्रम सुरू केला नाही, तर जिल्ह्यातही बालविवाहांबाबतची स्थिती मान खाली घालणारी ठरू शकते.

लहान वयात लग्न झाल्यास आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा व गरोदरपणात घ्यायची काळजी हे तर दूरचे विषय असतात. त्यामुळे बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षांत गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात हे असे घडणे विचार शक्तीला काळिमा आहे. आदिवासी व ग्रामीण भागात अशा घटना घडण्याची शक्यता असते. मात्र, चंद्रपूर शहरातील इंदिरानगरात डिसेंबर २०२० मध्ये बालविवाह झाला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टारगेट ग्रुपला ही माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचविले.

आरोपी मुलाविरुद्ध नुकताच २० डिसेंबर २०२० रोजी रामनगर ठाण्यात गुन्हा केला. २०१९-२० मध्ये तीन अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचविले.

कुटुंबांकडून करारपत्र लिहून घेतले

भद्रावती येथेही दोन कुटुंबाकडून बालविवाह लावून देणार नाही, असे करारपत्र लिहून घेतले. कोरपना तालुक्यातील सुब्बई येथील अशा घटनेत आंध्र प्रदेशातील एकाविरुद्ध कारवाई झाली. लहान वयात लादलेला गरोदरपणा व प्रसूतीमुळे अपंगत्व येऊ शकते. गर्भपात, कमी वजनाचे अर्भक, अकाली प्रसूती, अर्भक मृत्यू व उपजत मृत्यूची शक्यता व माता मृत्यूचे प्रमाण वाढते, हे प्रशिक्षित कार्यकर्तेच समुपदेशनातून समाजावून सांगू शकतात.

अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता व परंपरांनी घात

अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता व परंपरा, आदी कारणांनी बालविवाह घडून येतात.

विवाहासाठी मुलीचे वय १८ व मुलाचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.

बाल विवाहात मुलीचे रूप, बुद्धिमत्ता, पात्रता, वय आदींबाबत प्रतिगामी विचार जोपासणाऱ्यांना काही घेणे-देणे नसते. त्यामुळे प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जिल्हाभरात जाळे तयार करणे हाच पर्याय आहे.

कोट

जिल्ह्यात ग्रामीण १५९३ व नगर परिषद क्षेत्रात १०९७ पैकी ३० बालसंरक्षण समित्या गठित झाल्या. उर्वरित समित्या गठित करण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊन काळातही जागृती सुरू होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा महिला व बालक विकास अधिकारी रमेश टेटे, आरोग्य, शिक्षण विभाग यांचेही सहकार्य मिळत आहे.

-अजय साखरकर, जिल्हा संरक्षण अधिकारी, चंद्रपूर.