शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ...

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्यासाठी राजुरा तालुक्यातील भेंडारा मध्यम प्रकल्पाला सन १९९० मध्ये मंजुरी मिळाली व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला सन १९७७ मध्ये मंजुरी मिळाली. गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर-टोमटा उपसा सिंचन योजनेला सन १९९१ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या कामांना जवळपास ३० वर्षे लोटूनही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली आहे. अद्ययावत परिस्थितीचा आढावा घेतला असता निधीअभावी प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आली नसल्याबाबतची माहिती समोर आली. भेंडारा प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच डोंगरगाव मध्यम प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. ३० वर्षांच्या कालावधीनंतरही सदर प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाविषयी असंतोष पसरत आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथे सिंचन सुविधेअभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते. अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतक-यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

निधीअभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

प्रकल्प पूर्ण झाले तर सुजलाम् सुफलाम्

हे रखडलेले तीनही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होतील. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यासाठी या तीनही प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची गरज आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.

===Photopath===

050621\screenshot_2021_0604_184552.png

===Caption===

सुभाष धोटे फोटो