शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ...

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्यासाठी राजुरा तालुक्यातील भेंडारा मध्यम प्रकल्पाला सन १९९० मध्ये मंजुरी मिळाली व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला सन १९७७ मध्ये मंजुरी मिळाली. गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर-टोमटा उपसा सिंचन योजनेला सन १९९१ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या कामांना जवळपास ३० वर्षे लोटूनही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली आहे. अद्ययावत परिस्थितीचा आढावा घेतला असता निधीअभावी प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आली नसल्याबाबतची माहिती समोर आली. भेंडारा प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच डोंगरगाव मध्यम प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. ३० वर्षांच्या कालावधीनंतरही सदर प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाविषयी असंतोष पसरत आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथे सिंचन सुविधेअभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते. अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतक-यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

निधीअभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

प्रकल्प पूर्ण झाले तर सुजलाम् सुफलाम्

हे रखडलेले तीनही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होतील. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यासाठी या तीनही प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची गरज आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.

===Photopath===

050621\screenshot_2021_0604_184552.png

===Caption===

सुभाष धोटे फोटो