शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ...

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्यासाठी राजुरा तालुक्यातील भेंडारा मध्यम प्रकल्पाला सन १९९० मध्ये मंजुरी मिळाली व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला सन १९७७ मध्ये मंजुरी मिळाली. गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर-टोमटा उपसा सिंचन योजनेला सन १९९१ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या कामांना जवळपास ३० वर्षे लोटूनही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली आहे. अद्ययावत परिस्थितीचा आढावा घेतला असता निधीअभावी प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आली नसल्याबाबतची माहिती समोर आली. भेंडारा प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच डोंगरगाव मध्यम प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. ३० वर्षांच्या कालावधीनंतरही सदर प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाविषयी असंतोष पसरत आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथे सिंचन सुविधेअभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते. अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतक-यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

निधीअभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

प्रकल्प पूर्ण झाले तर सुजलाम् सुफलाम्

हे रखडलेले तीनही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होतील. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यासाठी या तीनही प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची गरज आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.

===Photopath===

050621\screenshot_2021_0604_184552.png

===Caption===

सुभाष धोटे फोटो