शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प धूळ खात

By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका येतो. करोडो रुपये खर्चून गोंडपिपरी तालुक्यात सोनापूर टोमटा, किरमिरी, नंदवर्धन हे तीन सिंचन प्रकल्प...

कोट्यवधी रुपये पाण्यात : बळीराजाच्या जखमेवर प्रशासनाचे मीठगोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका येतो. करोडो रुपये खर्चून गोंडपिपरी तालुक्यात सोनापूर टोमटा, किरमिरी, नंदवर्धन हे तीन सिंचन प्रकल्प २० वर्षापूर्वी उभारण्यात आले. पण अद्यापही कोणताही लाभ झालेला नाही. सदर सिंचन प्रकल्प धूळ खात आहेत. एकीकडे सिंचन प्रकल्पाचा लाभ नाही. दुसरीकडे मात्र गाळ काढणे, कालवे दुरुस्ती व इतर कामासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तेही पाण्याविनाच आहेत. त्यामुळे बळीराजाच्या साऱ्या अपेक्षा अधांतरी पडल्या. काही दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने बळीराजाचे कंबरडे मोडले जात आहे. अशावेळी सिंचन प्रकल्प कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचन प्रकल्प धूळ खात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यात संताप दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या सिंचन मुद्यावर राजुऱ्यातील नेत्यांनी आमदारकी मिळविली. ही परंपरा आताचीच नसून फार काळापासून चालत आलेली आहे. आता विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे हाच वारसा चालवित आहेत. तालुक्यात वर्धा, वैनगंगा, अंधारी या बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. वर्धा नदीवर उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प दिवास्वप्नच ठरले आहे. शिवनीजवळ ४७ हजार करोड रुपये खर्चून तेलंगणा सरकार प्राणहिता नदीवर प्राणहिता चव्वेला महाधरणाचे काम करीत आहे. या धरणाने संपूर्ण तेलंगणा सुजलाम् सुफलाम् होणार आहे. याउलट बारमाही तीन मोठ्या नद्या असूनही गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी उपेक्षितच आहेत. गेल्या १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशातच गेल्या महिन्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या ताज्या आहेत. तालुक्यातील शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहे. सिंचन प्रकल्प रखडले असल्याने शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सीमावर्ती भागातील बळीराजांना दिलासा देण्याचे काम आमदारांकडून अपेक्षित होते. मात्र त्यांचेही या मुद्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोजोली येथील युवकाने आत्महत्या केली होती. (शहर प्रतिनिधी)