शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत बीडीओंचा प्रभार तिघांकडे; पंचायत समितीच्या विकास योजनांवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:17 IST

Chandrapur : प्रशासकीय गतिमानता नावापुरतीच

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क नागभीड: येथील गटविकास अधिकाऱ्यांचे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. याचा पदभार पुन्हा प्रभारींकडेच सोपविण्यात आला. सहा महिन्यांत तिसऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे प्रशासकीय गतिमानतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहे. 

नियमित गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर लाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या रुजू झाल्या नाहीत. परिणामी, गटविकास अधिकाऱ्यांचा प्रभार सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी शुक्रे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी जुलै महिन्यापर्यंत कारभार पाहिला. दरम्यान त्यांचेही स्थानांतरण झाल्याने सावली येथील मधुकर वासनिक यांच्याकडे पद सोपविण्यात आले. वासनिक यांना प्रभार घेऊन सव्वा महिना होत नाही तोच, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय कारण देत ८ ऑगस्ट २०२४ रोजी एक आदेश जारी केला. त्यानुसार चंद्रपूर येथील सहायक गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांची या पदावर नियुक्ती केली. आता चव्हाण यांच्याकडे हा प्रभार किती दिवस राहतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे. विकास कामांना न्याय देण्यासाठी येथे पूर्णवेळ गटविकास अधिकारी नियुक्त नसल्याने प्रशासकीय गतिमानतेचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे

शिक्षण विभागात पूर्ण वेळ नाही अधिकारीमागील सहा सात वर्षांपासून येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांचेही पद रिक्त आहे. मधल्या काळात हे पद फक्त एकदाच भरण्यात आले होते. गतवर्षी पूर्णवेळ गटशिक्षण अधिकारी सेवानिवृत्त झाले. या पदाचाही प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. आठ वर्षांपासून हेच सुरू आहे, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे प्रभार देऊन वेळ निभावून नेण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांवर उरला नाही वचक

  • नागभीड पंचायत समितीत पूर्णवेळ गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती न करता नेहमी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार दिला जात आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला. पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही.
  • मनमानीपणा वाढला. हजेरी लावल्यानंतर नियमित कर्तव्य बजावणारे दुर्मीळ झाले. त्यामुळे कामे घेऊन येणारे नागरिक व सरपंचांची कामे वेळेवर होत नाहीत, असा आरोप मेंढ्याचे सरपंच व तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आनंद कोरे यांनी केला.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर